Maharashtra Weather Update :महाराष्ट्रात मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच उन्हाची तीव्रता वाढू लागली असून अनेक भागांत तापमान झपाट्याने वाढत आहे.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील काही जिल्ह्यांसाठी उष्णतेचा इशारा देत यलो अलर्ट जारी केला आहे. विशेषतः विदर्भात तापमान मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून पुढील काही दिवस उष्णतेची लाट जाणवण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.(Maharashtra Weather Update)
फेब्रुवारी २०२६ पासून अल निनोचा प्रभाव काहीसा कमी झाला असला तरी वर्षाच्या मध्यापासून त्याची पुन्हा सक्रियता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या काळात उष्णतेची तीव्रता अधिक वाढण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
राज्यात तापमान सामान्यपेक्षा ४ ते ८ अंशांनी जास्त
राज्यातील बहुतांश भागांमध्ये सध्या तापमान सामान्यपेक्षा ४ ते ८ अंश सेल्सिअसने जास्त नोंदवले जात आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ८ मार्च रोजी राज्यात कुठेही ढगाळ वातावरण किंवा अवकाळी पावसाची शक्यता नाही. त्यामुळे उन्हाचा तडाखा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
कोकणात दमट उष्णता
मुंबईसह कोकण किनारपट्टी भागात उष्ण आणि दमट हवामान कायम आहे. मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून यलो अलर्ट लागू आहे.
या भागात दमट वातावरणामुळे नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवत आहे. मुंबईत कमाल तापमान ३१ ते ३५ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २४ ते २६ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
पश्चिम महाराष्ट्रात उन्हाचा चटका
पश्चिम महाराष्ट्रात देखील तापमानात वाढ झाली आहे. पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांमध्ये कोरडे आणि उष्ण हवामान कायम आहे.
या भागात कमाल तापमान ३४ ते ३८ अंश सेल्सिअसदरम्यान नोंदवले जात आहे. पुणे परिसरात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती निर्माण होत असल्याचे जाणवत आहे.
उत्तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला
उत्तर महाराष्ट्रात नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यांमध्ये उष्ण आणि कोरडे हवामान कायम आहे.
या भागात कमाल तापमान ३६ ते ३९ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यातही तापमान वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
मराठवाड्यात मार्चमध्येच चाळीशी
मराठवाड्यात मार्च महिन्यातच उन्हाचा कहर दिसून येत आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, लातूर, नांदेड, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये कमाल तापमान ३७ ते ४० अंश सेल्सिअसदरम्यान पोहोचले आहे. काही ठिकाणी तापमानाने चाळीशी पार केली असल्याचेही नोंदवले जात आहे.
विदर्भात सर्वाधिक उष्णता
विदर्भात सर्वाधिक तापमानाची नोंद होत असून नागपूर, अकोला, अमरावती आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमान ३८ ते ४१ अंश सेल्सिअसदरम्यान राहण्याचा अंदाज आहे.
काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण होण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
तापमान आणखी वाढण्याची शक्यता
हवामान विभागाच्या अंदाजानुसार ८ आणि ९ मार्चदरम्यान तापमानात आणखी २ ते ३ अंश सेल्सिअस वाढ होऊ शकते. त्यामुळे राज्यातील अनेक भागांत उष्णतेची तीव्रता अधिक जाणवू शकते. पुढील काही दिवस पावसाची कोणतीही शक्यता नसल्याने उन्हाचा प्रभाव कायम राहण्याचा अंदाज आहे.
तापमान का वाढत आहे?
सध्या वातावरण कोरडे आहे आणि आकाश स्वच्छ असल्यामुळे सूर्यकिरण थेट जमिनीवर पडत आहेत. ढगांचे आच्छादन नसल्यामुळे उष्णता जमिनीवर साठत असून त्यामुळे तापमानात सातत्याने वाढ होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी सांगितले आहे.
नागरिकांनी घ्यावी काळजी
उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.
* दुपारच्या वेळी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे, भरपूर पाणी प्यावे आणि हलके व सैल कपडे परिधान करावेत, असे सांगण्यात आले आहे.
* विशेषतः लहान मुले, वृद्ध व्यक्ती आणि आजारी नागरिकांनी उष्णतेपासून अधिक सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना सल्ला
* वाढत्या उष्णतेमुळे पिकांमधील मातीतील ओलावा टिकवण्यासाठी सकाळी किंवा संध्याकाळी हलके पाणी द्यावे.
* भाजीपाला, फळबाग आणि उन्हाळी पिकांमध्ये मल्चिंगचा वापर केल्यास मातीतील ओलावा टिकून राहण्यास मदत होते, असा सल्ला देण्यात आला आहे.
Web Summary : Maharashtra weather update indicates potential changes. Stay informed about the forecast and expected impacts to prepare accordingly. Details on temperature and rainfall patterns are crucial for planning activities. Monitor for updates.
Web Summary : महाराष्ट्र मौसम अपडेट संभावित बदलावों का संकेत देता है। पूर्वानुमान और अपेक्षित प्रभावों के बारे में सूचित रहें ताकि उसके अनुसार तैयारी कर सकें। तापमान और वर्षा के पैटर्न की जानकारी गतिविधियों की योजना बनाने के लिए महत्वपूर्ण है। अपडेट के लिए निगरानी रखें।