Join us

Maharshtra Weather Update : हवामान विभागाचा इशारा; पुढील चार दिवस राज्यात पावसाचा जोर कायम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2025 09:19 IST

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू असून शेतकऱ्यांच्या चिंता पुन्हा वाढल्या आहेत. कोकण ते विदर्भ, सर्वत्र सरींचा जोर कायम आहे. हवामान विभागाने दिला ‘यलो अलर्ट’ आणि सावधानतेचा इशारा दिला आहे. (Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात अवकाळी पावसाचा कहर सुरू असून शेतकऱ्यांच्या चिंता पुन्हा वाढल्या आहेत.  (Maharashtra Weather Update)

कोकण ते विदर्भ, सर्वत्र सरींचा जोर कायम आहे. हवामान विभागाने दिला ‘यलो अलर्ट’ आणि सावधानतेचा इशारा दिला आहे.(Maharashtra Weather Update)

दिवाळीनंतर अवकाळी पावसाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली असून, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार सरी कोसळत आहेत. 

अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आणि गारठा वाढल्याने नागरिकांना थंड वातावरणाचा अनुभव येत असला तरी शेतकऱ्यांसाठी हा पाऊस धोकादायक ठरत आहे.

विशेषतः काढणीला आलेल्या भात, सोयाबीन, मका आणि कापूस पिकांचे मोठे नुकसान होत असल्याचे अहवाल मिळत आहेत.

पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहणार आहे. 

बहुतांश जिल्ह्यांसाठी ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हवामानाच्या स्थितीकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

समुद्रात दोन कमी दाबाचे पट्टे

मध्यपूर्व अरबी समुद्रावर सध्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हे क्षेत्र पुढील तीन ते चार दिवस उत्तर दिशेकडे सरकणार असून, महाराष्ट्राच्या किनारपट्टी आणि आतील भागात पावसाचा जोर वाढवेल.

तर दुसरीकडे, आग्नेय बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचे पुढील ४८ तासांत चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता आहे. हे चक्रीवादळ २७ ऑक्टोबरला तयार होऊन आंध्र प्रदेश आणि ओडिशा किनारपट्टीकडे सरकणार आहे. या दोन्ही प्रणालींच्या संयुक्त परिणामामुळे महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाची शक्यता वाढली आहे.

जिल्हानिहाय हवामान अलर्ट

२६ ऑक्टोबर : मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, पुणे, नगर, नाशिक, धुळे, नंदुरबार, सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड आणि संपूर्ण विदर्भात ‘यलो अलर्ट’.

२७ ऑक्टोबर : रायगड, पुणे, नगर, बीड, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; उर्वरित भागात हलका ते मध्यम पाऊस.

२८ ऑक्टोबर : सिंधुदुर्ग, कोल्हापूर, नांदेड, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’; दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका पाऊस.

तळकोकणात काय परिस्थिती आहे?

अरबी समुद्रातील कमी दाबाच्या प्रभावामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात सतत पावसाची रिपरिप सुरू आहे. समुद्रात वादळसदृश परिस्थिती असल्याने मच्छीमारी पूर्णपणे ठप्प झाली आहे. 

अनेक बोटी देवगड बंदरात आणि गुजरात किनाऱ्यावर आश्रयाला गेल्या आहेत.

हवामान विभागाने 28 ऑक्टोबरपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे.

शेतकऱ्यांना सल्ला

* पावसाळी वातावरणात कापणी टाळावी; हवामान स्थिर झाल्यावरच काढणी करावी.

 * काढलेले धान्य तातडीने सुरक्षित ठिकाणी किंवा ताडपत्रीखाली साठवावे.

पुढील परिस्थिती कशी असेल?

तज्ज्ञांच्या मते, नोव्हेंबरच्या सुरुवातीस हवामान स्थिर होण्याची शक्यता आहे आणि कोरडे वातावरण परत येईल. मात्र, पुढील काही दिवस राज्यात मुसळधार सरींचा धोका कायम राहणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांनी अवकाळी पावसामुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी सतर्क राहणे, काढणीचे नियोजन नीट करणे आणि हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे.

हे ही वाचा सविस्तर : Marathwada Vidarbha Rain Alert : उत्तर-पूर्व मान्सूनचा प्रभाव; 'या' जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि हलक्या सरींची शक्यता

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Weather Alert: Latest Forecast and Updates Across the State

Web Summary : Maharashtra faces changing weather. Stay updated on evolving conditions. The state anticipates shifts, impacting daily life. Monitor forecasts for informed decisions. Be prepared for potential weather changes across Maharashtra.
टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजपाऊसमहाराष्ट्रविदर्भकोकण