Join us
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Weather Update : हवामानाचा मोठा अलर्ट; 'या' तारखांमध्ये वादळी पाऊस आणि गारपीट निश्चित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2026 09:11 IST

Maharashtra Weather Update : राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट निर्माण झाले आहे. हवामान विभागाने पुढील काही दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस, मेघगर्जना आणि गारपीटीची शक्यता वर्तविली असून शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे रब्बी पिकांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.(Maharashtra Weather Update)

Maharashtra Weather Update : राज्यात सध्या उन्हाचा कडाका वाढलेला असतानाच हवामानात अचानक बदल होऊन अवकाळी पावसाचे नवे सत्र सुरू होण्याची चिन्हे दिसत आहेत. (Maharashtra Weather Update)

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ३० मार्चपासून ते ४ एप्रिलदरम्यान राज्यातील अनेक भागांत वादळी वाऱ्यासह पाऊस, मेघगर्जना आणि काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पुढील चार दिवस विशेष सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.(Maharashtra Weather Update)

कुठे कसा राहणार परिणाम?

३० मार्च रोजी खानदेश, मराठवाडा, पश्चिम विदर्भ तसेच मध्य महाराष्ट्रातील घाट परिसरातील जिल्ह्यांमध्ये विजांचा कडकडाट, जोरदार वारे, पाऊस आणि ठिकठिकाणी गारपीटीची शक्यता आहे. उर्वरित विदर्भातही वातावरणात बदल होऊन हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

३१ मार्च रोजी पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता असली तरी वातावरण पूर्णपणे स्थिर राहणार नाही. काही भागांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पाऊस सुरूच राहू शकतो.

मात्र १ ते ४ एप्रिलदरम्यान पुन्हा एकदा वादळी पावसाचे प्रमाण वाढण्याचा अंदाज आहे. या कालावधीत वारे, विजांचा कडकडाट आणि गारपीट यांचा धोका अधिक राहण्याची शक्यता आहे.

शेती पिकांसाठी धोका वाढला

राज्यात सध्या रब्बी पिकांची काढणी सुरू आहे. अशा परिस्थितीत अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्यास काढणी केलेल्या तसेच उभ्या पिकांचे मोठे नुकसान होऊ शकते. विशेषतः गहू, हरभरा, कांदा यांसारख्या पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.

मेघगर्जना आणि विजांचा कडकडाट होत असताना शेतात किंवा उघड्यावर थांबणे टाळावे. झाडाखाली, टिनशेडखाली किंवा वीज खांब, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत वाहिन्यांच्या जवळ उभे राहू नये. पाळीव जनावरांनाही सुरक्षित ठिकाणी ठेवावे.

सतर्क राहा

पुढील चार दिवस हवामान अस्थिर राहणार असल्याने शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच शेतीची कामे नियोजित करावीत. वेळेवर घेतलेली खबरदारी मोठे नुकसान टाळू शकते, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला

* काढणी केलेले पीक मोकळ्या जागेत न ठेवता सुरक्षित ठिकाणी साठवा

* पिकांवर ताडपत्री किंवा प्लास्टिक आच्छादन वापरा

* शेतातील निचऱ्याची व्यवस्था व्यवस्थित ठेवा

* वादळी वाऱ्यामुळे झाडे/पिके पडू नयेत यासाठी आवश्यक उपाययोजना करा

* विजेपासून सुरक्षित राहा

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : उकाड्यानंतर अचानक पावसाची एन्ट्री; शेतकरी आणि नागरिकांसाठी IMD चा मोठा अलर्ट

अधिक वाचा : Vidarbha River Linking Project : वैनगंगा-नळगंगा प्रकल्पाला मोठी गती; 'या' ८ जिल्ह्यांचे बदलणार चित्र!

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Weather Alert: Latest Updates and Forecast Overview

Web Summary : Maharashtra is experiencing shifting weather patterns. Stay updated with the latest forecasts as conditions are expected to change rapidly. Prepare for potential weather variations impacting daily life across the region. Monitor local news for timely alerts and safety advisories from authorities. Be ready for anything Mother Nature throws at you.
टॅग्स :शेती क्षेत्रहवामान अंदाजमहाराष्ट्रविदर्भकोकणमराठवाडा