Maharashtra Rain Alert : कोकणासहमुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. ढगाळ वातावरण, वाऱ्याचा वेग, विजांचा कडकडाट आणि मुसळधार सरी यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)
ठाणे आणि नवी मुंबईमध्ये दिवसभर ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. सकाळच्या सुमारास तुरळक सरी बरसतील, तर दुपारनंतर काही भागांत पावसाचा जोर वाढू शकतो. विजांच्या कडकडाटाचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे. तापमान २७ अंश सेल्सिअस ते ३१ अंश सेल्सिअस दरम्यान राहील.(Maharashtra Weather Update)
कोकणच्या सर्व जिल्ह्यांमध्ये आज दिवसभर पावसाची शक्यता असून, काही भागांत मध्यम ते मुसळधार सरी कोसळू शकतात.(Maharashtra Weather Update)
आकाश ढगाळ राहणार असून, हवामानात आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल. तापमान अंदाजे २५ अंश सेल्सिअस ते ३० अंश सेल्सिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे. समुद्रकिनाऱ्यावर जाणाऱ्यांनी विशेष काळजी व सतर्कता बाळगावी.
महाराष्ट्रात पावसाची धडकेबाज एन्ट्री झाली असून कोकण, मुंबई आणि ठाणे परिसरात ढगांची गर्दी झाली असून विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
पावसाने पुन्हा एकदा दमदार हजेरी लावली आहे. कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि ठाणे जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झालं असून आजच्या दिवशी पावसाच्या सरींनी गर्दी होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने (IMD) आज (२९ जून) रोजी महाराष्ट्रातील कोकण भागासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.विशेषतः मुंबई, पालघर, ठाणे आणि नवी मुंबई या भागांत ढगाळ वातावरण राहणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. काही ठिकाणी जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट होण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टी सर्तकतेचा इशारा
सर्व जिल्ह्यांमध्ये आज पावसाची शक्यता असून काही भागात मध्यम ते मुसळधार सरी बरसतील. आकाश ढगाळ राहणार असून आर्द्रता वाढलेली असेल. तापमान २५ अंश सेल्सिअस ते ३० अंश सेल्सिअसपर्यंत राहील.
नागरिकांनी व शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊनच दिवसाचे नियोजन करावे. सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता असल्याने विशेष काळजी घ्या.
शेतकऱ्यांसाठी सल्ला
* जमिनीत पाणी साचू नये यासाठी योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी.
* पेरणीची तयारी करत असाल, तर पावसाचे प्रमाण आणि वेळ याची अचूक माहिती घेऊनच पुढे जावे.
मच्छीमार बांधवांसाठी सल्ला
* समुद्रकिनाऱ्यांवर वाऱ्याचा वेग वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
* हवेचा दाब कमी झाल्यास लहान होड्यांसाठी धोका निर्माण होऊ शकतो. मच्छीमारांनी हवामान खात्याच्या इशाऱ्यांकडे लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.