अहिल्यानगर : राज्यात लहान, मध्यम व मोठे एकूण एकत्रित सुमारे 2997 इतकी धरणे असून यावर्षीच्या 05 सप्टेंबर 2025 रोजी या सर्व धरणांमध्ये सुमारे 86.07 टक्के (1232.13 टी.एम.सी) इतका उपयुक्त पाणीसाठा निर्माण झाला असल्याची माहिती जलसंपत्ती अभ्यासक व जल सिंचन तज्ञ इंजि. हरिश्चंद्र चकोर यांनी दिली आहे.
त्याचबरोबर गतवर्षी याच दिवशी राज्यातील धरणांमधील पाणीसाठा हा 81.31 टक्के (1163.99 टी.एम.सी.) इतकाच होता. मात्र यावर्षी सुमारे 5% टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा जास्त आहे. राज्यातील एकूण 138 मोठे पाटबंधारे प्रकल्पांमध्ये आजमितीस सुमारे 958.86 टीएमसी ( 93.19%), 260 मध्यम पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सुमारे 189.25 टीएमसी (77.79%) आणि 2599 लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सुमारे 122.03 टी.एम.सी.( 58.31%) इतका उपयुक्त पाणीसाठा आजमितीस झालेला आहे. यावर्षीच्या( सन 2025) 07 मे 5 सप्टेंबर पर्यंत पडलेल्या पावसामुळे राज्यातील धरणांमध्ये उत्तम पाणीसाठा झालेला असल्याने शेतकरी वर्गामध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.
सद्यस्थितीत गेल्या 15 दिवसांपासून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, खानदेश, मराठवाडा, विदर्भासह जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून या विभागांतील बहुतेक धरणे तुडुंब भरली असून धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे पूर परिस्थिती देखील निर्माण झालेली पाहावयास मिळत आहे. बहुतेक धरणे पूर्णपणे भरली असून यापुढे धरणांमधून सातत्याने पाणी विसर्ग नदीपात्रात सोडावे लागणार आहे.
विभागनिहाय धरण पाणीसाठा (05 सप्टेंबर पर्यत)
- कोकण विभागात एकूण 173 धरणे असून त्यांमध्ये आजमीतीस सुमारे 121.46 टी.एम.सी.( 92.83%) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
- नाशिक विभागात 537 इतकी लहान,मध्यम व मोठी धरणे असून त्यामध्ये आजमितीस 168.72 टीएमसी (80.48%) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
- नाशिक जिल्ह्यातील प्रमुख 25 धरणांमधील उपयुक्त पाण्यासाठ्याची टक्केवारी सुमारे 98.50 टक्के इतकी असून ती गतवर्षीपेक्षा 4% टक्क्यांनी जास्त असल्याने नाशिककरांची पाण्याची चिंता जवळपास मिटली आहे. आजमितीस भोजापुर धरणात सुमारे 93 टक्के (334 द.ल.घ.फुट ) इतका उपयुक्त पाणीसाठा आहे.
- पुणे विभागात एकूण 720 धरणे असून त्यामध्ये आज 491.74 टीएमसी (91.54%) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे.
- मराठवाडा विभागामध्ये एकूण 920 धरणे असून त्यामध्ये आज सुमारे 208.03 टीएमसी (81.13) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या 15 दिवसात मराठवाडा पडलेल्या प्रचंड पर्जन्यवृष्टीमुळे धरण साठ्यांत सुमारे टीएमसी(17%) इतकी पाणी वाढ झाली आहे.
- अमरावती विभागामध्ये 264 धरणे असून त्यामध्ये 112.84 टीएमसी (84.50%) पाणीसाठा आहे.
- नागपूर विभागात 383 धरणे असून या धरणांमध्ये 129.44 टीएमसी (78.93%) टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे.
- सर्वात जास्त पाणीसाठा कोकण विभागात (92.83%) आणि त्या खालोखाल पुणे विभागात (91.54) असून सर्वात कमी पाणीसाठा नागपूर विभागात (78.93%)असल्याचे दिसून येत आहे.
महत्त्वाचे म्हणजे राज्यातील प्रमुख मोठ्या सात (15) धरणांमधील एकूण एकत्रित पाणीसाठा
१) उजनी धरण -120.83 टी.एम.सी.( 103.06% ) *
२) कोयना --103.53 टी.एम.सी.( 98.35%).
३) जायकवाडी --101.34 टी.एम.सी. ( 98.65%)
४) गिरणा धरण--17.78 टी.एम.सी.(96.17%)
५) गोसीखुर्द --11.84 टीएमसी (45.31%)
६) पेंच प्रकल्प --32.43 टीएमसी (90.30%)
७) भातसा धरण --32.29 टीएमसी (97.06%)
८) मुळशी --19.60 टीएमसी (97.25%)
९) भाटघर --23.50 टीएमसी (100%)
१०) ईसापुर(पेनगंगा)-33.37 टीएमसी (98.02%)
११) वारणा::::26.79 टीएमसी (97.23%)
१३) राधानगरी:::7.68 टीएमसी (98.96%)
१४) उर्ध्व वर्धा::::18.74 टीएमसी (94.06%)
१५) अलमट्टी::::::105.47 टीएमसी (100%) इतका पाणीसाठा झालेला आहे
तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेकडे असलेल्या पाच (5) धरणांमध्ये सुमारे 17.63 टी.एम.सी.( 99.21%) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. ठाणे महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या बारावे धरणात सुमारे 11.49 टीएमसी (98.20) इतका पाणीसाठा आहे. नवी मुंबईसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या मोराबे आणि हेटवणे धरणात एकूण सुमारे 11.55 टी.एम.सी. म्हणजेच सरासरी (98.85) इतका उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे..
या पावसाळ्यामध्ये आज पर्यंत सर्वात जास्त पाऊस म्हणजे घाट माथ्यावर मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुळशी --6839 मिमी, घाटघर --4720 मिमी, महाबळेश्वर--5210 मिमी लोणावळा-4775 मिमी नातुवाडी(कोकण)--4312 मिमी, सुर्या धरण (पालघर)--3501मिमी इतका एकूण पाऊस चालू पावसाळ्यामध्ये आत्तापर्यंत नोंदविला गेला आहे.
या ठिकाणी सर्वाधिक पाऊस
विशेष म्हणजे सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यामध्ये आजमितीस राज्यातील सर्वात कमी म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी मतदारसंघातील लोणी येथे फक्त 143 मिमी इतक्या पाऊसाची नोंद झालेली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील प्रमुख धरण असलेल्या भंडारदरा धरणात सुमारे 10.99 टीएमसी (99.53%),निळवंडे धरणात 8.30 टीएमसी(99.71%) मुळा धरणात 25.77 टीएमसी (99.11%), आढळा धरण-1.060 टीएमसी (100%) इतका एकूण पाणीसाठा झालेला आहे. महाराष्ट्राची चेरापुंजी समजल्या जाणाऱ्या पश्चिमघाट माथ्यावरील "घाटघर "येथे आत्तापर्यंत सुमारे 4720 मिमी पावसाची नोंद झालेली आहे.
काल सर्वात जास्त पावसाची नोंद ही कोकण गडनदी (कोकण) येथे 31 मिमी त्याचप्रमाणे नवजा (कोयना परिसर)--44 मिमी., महाबळेश्वर- 37 मिमी., सुर्या प्रकल्प (कोकण)-- 45/3501 मिमी. इतका पाऊसाची नोंद झालेली आहे. यावर्षीच्या पावसाळ्यामध्ये जवळपास सर्वच महसूल विभागामधील धरणांमध्ये अत्यंत समाधानकारक पाणीसाठा झाल्याने व अजूनही पावसाळा शिल्लक असल्याने यावर्षी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निश्चितच मिटला आहे. शेती सिंचनासाठी देखील मोठा दिलासा व फायदा मिळणार आहे
तसेच जायकवाडी धरणामध्ये सुमारे 101.34 टीएमसी (98.65) इतका एकूण पाणीसाठा झाला आहे. धरण पूर्ण संचय पातळी नियमन सूचीनुसार (ROS) जायकवाडी धरणामधून सांडव्याद्वारे गोदावरी नदी पात्रात सोडण्यात येत आहे. आतापर्यंत जायकवाडी धरणात यावर्षीचा एक (01) जून 2025 पासून पावसाळ्यामध्ये एकूण 89.74 टीएमसी इतकी पाणी आवक झाली. आतापर्यंत सांडव्यावरुन गोदावरी नदी पात्रात सुमारे 30.48 टीएमसी इतके पाणी सोडण्यात आलेले आहे.
राज्यातील सर्वच प्रादेशिक विभागामधील बहुतांश धरणे ही पूर्ण क्षमतेने भरलेली असून यापुढे धरण पूर्ण संचय पातळी नियमन सूचीनुसार (आर.ओ.एस) धरणांमधून नदीपात्रामध्ये पाणी विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्याचबरोबर गेल्या 15 दिवसांपासून मराठवाड्यात पडणाऱ्या जोरदार पर्जन्यवृष्टीमुळे मराठवाड्यातील बहुतेक धरणे पूर्ण क्षमतेने शंभर टक्के भरण्याच्या मार्गावर असल्याने येलदरी, माजलगाव, ईसापुर (पेनगंगा), विष्णुपुरी, दुधना, मांजरा, तेरणा, सिध्देश्वर, सीनाकोळेगाव या धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग गोदावरी नदीत सोडण्यात येत आहे.
तसेच आज ढालेगाव (परभणी) येथे गोदावरी नदी पात्रात सुमारे 53,926 क्युसेक्स आणि नांदेड (जुनापुल) येथे सुमारे 14,612 क्युसेक्स इतका पाणी विसर्ग गोदावरी नदी पात्रात सुरू आहे. राजापूर बंधारा (कृष्णा नदी)--60176 क्युसेक्स आणि प्रकाशा बरेच (तापी नदी) --1,11,215 क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे. तसेच महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असलेल्या अलमट्टी धरणामध्ये 105.47 टीएमसी( 100%) पाणीसाठा असून या धरणा मधून सुमारे 21012 क्युसेक्स इतका पाणी विसर्ग सोडण्यात येत आहे
मराठवाड्यात समाधान
आता मराठवाडा विभागात समाधानाचे वातावरण पाहायला मिळत असले तरी बहुतेक ठिकाणी विशेषतः नांदेड जिल्ह्यात ढगफुटी सदृश्य पर्जन्यवृष्टी झाल्याने उभ्या पिकांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शासनाकडून तातडीने भरपाई मिळावी अशी आग्रही मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली असल्याची माहिती इंजि. हरिश्चंद्र र चकोर यांनी दिली.
- इंजि. हरिश्चंद्र .र. चकोर, जलसंपदा (से.नि) संगमनेर.