Lokmat Agro >हवामान > Jayakawadi Dam Water: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; जायकवाडी धरणात वेळेआधी पाणी वाचा सविस्तर

Jayakawadi Dam Water: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; जायकवाडी धरणात वेळेआधी पाणी वाचा सविस्तर

latest news Jayakawadi Dam Water: Good news for farmers; Read water in Jayakawadi Dam ahead of time in detail | Jayakawadi Dam Water: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; जायकवाडी धरणात वेळेआधी पाणी वाचा सविस्तर

Jayakawadi Dam Water: शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी; जायकवाडी धरणात वेळेआधी पाणी वाचा सविस्तर

Jayakawadi Dam Water : जायकवाडी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदा मे महिन्यातच मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली आहे. मराठवाड्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे धरणात ४० दलघमी (टीएमसी) पाणी जमा झाले आहे. ही घटना गेल्या ५० वर्षांत प्रथमच घडली असून, या पाण्यामुळे ३० जूनपर्यंतची नियोजित पाणी पाळी रद्द करण्यात आली आहे. परिणामी, ६ टीएमसी पाण्याची बचत झाली असून, शेतकऱ्यांसह संपूर्ण मराठवाड्यासाठी ही एक मोठी दिलासादायक बाब ठरत आहे. (Jayakawadi Dam Water)

Jayakawadi Dam Water : जायकवाडी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदा मे महिन्यातच मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली आहे. मराठवाड्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे धरणात ४० दलघमी (टीएमसी) पाणी जमा झाले आहे. ही घटना गेल्या ५० वर्षांत प्रथमच घडली असून, या पाण्यामुळे ३० जूनपर्यंतची नियोजित पाणी पाळी रद्द करण्यात आली आहे. परिणामी, ६ टीएमसी पाण्याची बचत झाली असून, शेतकऱ्यांसह संपूर्ण मराठवाड्यासाठी ही एक मोठी दिलासादायक बाब ठरत आहे. (Jayakawadi Dam Water)

शेअर :

Join us
Join usNext

Jayakawadi Dam Water: जायकवाडी धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच यंदा मे महिन्यातच मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक झाली आहे. मराठवाड्यात झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे धरणात ४० दलघमी (टीएमसी) पाणी जमा झाले आहे. (Jayakawadi Dam Water)

ही घटना गेल्या ५० वर्षांत प्रथमच घडली असून, या पाण्यामुळे ३० जूनपर्यंतची नियोजित पाणी पाळी रद्द करण्यात आली आहे. परिणामी, ६ टीएमसी पाण्याची बचत झाली असून, शेतकऱ्यांसह संपूर्ण मराठवाड्यासाठी ही एक मोठी दिलासादायक बाब ठरत आहे. (Jayakawadi Dam Water)

मराठवाड्याचा प्रमुख जलस्रोत असलेल्या जायकवाडी धरणात यंदा मे महिन्यातच पाण्याची लक्षणीय आवक झाली असून, ५० वर्षांत प्रथमच धरणात ४० दलघमी (टीएमसी) इतके पाणी जमा झाले आहे. कोपरगाव, वैजापूर भागात झालेल्या जोरदार पावसामुळे ही पाण्याची आवक वाढली आहे. (Jayakawadi Dam Water)

दरवर्षी जायकवाडी धरणात जुलै महिन्याच्या प्रारंभी पाणी यायला सुरुवात होते आणि ऑगस्टमध्ये पाणीसाठा वाढतो. मात्र, यंदा पावसाळ्याआधीच, म्हणजे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातच धरणात पाण्याचा साठा वाढल्यामुळे पाणी नियोजनात मोठा बदल करण्यात आला आहे. (Jayakawadi Dam Water)

सध्या ३० टक्के पाणीसाठा शिल्लक

सध्या जायकवाडी धरणात १,३८१ दलघमी इतका पाणीसाठा आहे, जे सुमारे २९.६६ टक्के इतका आहे. यंदाच्या रब्बी व उन्हाळी हंगामात सुमारे ३७ टीएमसी पाणी औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यांसाठी वापरले गेले. तसेच १०.५ टीएमसी पाण्याचे बाष्पीभवन झाले आहे.

इतिहासात पहिल्यांदा मे महिन्यात पाण्याची आवक

१९७६ पासून जायकवाडी धरणात सहसा पावसाळ्यात दीड-दोन महिन्यांनंतरच पाण्याची आवक होते. मात्र, यावर्षी पावसामुळे पहिल्यांदाच मे महिन्यातच दीड टीएमसी पाणी आले. ही एक ऐतिहासिक बाब असून, बदलत्या हवामानाचाही यामागे मोठा वाटा असल्याचे सांगितले जात आहे.

मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जायकवाडी धरणात लक्षणीय पाण्याची आवक झाली आहे. त्यामुळे जूनअखेरपर्यंतची पाणी पाळी रद्द करून धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणात बचत करण्यात आली आहे. ही स्थिती शेतकऱ्यांसाठी दिलासादायक असून आगामी खरीप हंगामात पाण्याचा पुरवठा सुस्थितीत राहण्याची शक्यता आहे.

हे ही वाचा सविस्तर : Jayakawadi Dam: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता: सिंचनाचा मार्ग मोकळा! वाचा सविस्तर

Web Title: latest news Jayakawadi Dam Water: Good news for farmers; Read water in Jayakawadi Dam ahead of time in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.