Heatwave Alert : राज्यात अवकाळी पावसाचा प्रभाव कमी होताच आता उष्णतेच्या लाटेचा (Heatwave) धोका वाढला आहे.(Heatwave Alert)
पुढील काही दिवसांत महाराष्ट्रातील अनेक भागांत तापमान झपाट्याने वाढून ४० ते ४२ अंशांच्या दरम्यान जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे राज्यातील नागरिकांसह शेतकऱ्यांनाही कडक उन्हाचा सामना करावा लागणार आहे.(Heatwave Alert)
अवकाळीनंतर उष्णतेचा तडाखा
गेल्या काही दिवसांत राज्यातील विविध भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. मात्र आता वातावरणात मोठा बदल होत असून, ढगाळ वातावरण हटताच सूर्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे राज्यभरात उष्णतेची लाट येण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत.
४२ अंशांपर्यंत तापमान वाढण्याचा अंदाज
प्राथमिक अंदाजानुसार, मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान ४० ते ४२ अंशांपर्यंत पोहोचू शकते.
विदर्भात उष्णतेचा सर्वाधिक प्रभाव
मराठवाड्यात उष्ण वाऱ्यांचा तडाखा
मध्य महाराष्ट्रात तापमानात झपाट्याने वाढ
मुंबईसारख्या किनारी भागातही तापमान वाढणार असून, पुढील २४ तासांत कमाल तापमान ३५ ते ३८ अंशांपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
हवामान बदलामागील कारणे
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रावर निर्माण झालेल्या उच्च दाबाच्या क्षेत्रामुळे उष्ण वारे वाहू लागले आहेत. तसेच वातावरणात चक्राकार वाऱ्यांची निर्मिती झाल्याने वाऱ्यांची दिशा बदलली आहे.
याच परिणामामुळे काही भागांत उष्णतेची लाट, तर काही भागांत गारपीट व पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.
देशातील १२ राज्यांमध्ये अलर्ट
देशातील अनेक राज्यांमध्ये हवामानात मोठे बदल अपेक्षित आहेत. हिमालयीन भागात थंडी वाढणार असून, तर पूर्व आणि दक्षिण भारतात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही भागांत ताशी ५०–६० किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.
शेतकरी आणि नागरिकांसाठी इशारा
* वाढत्या उष्णतेमुळे पिकांवर परिणाम होण्याची शक्यता
* जनावरांसाठी पाणी व सावलीची व्यवस्था आवश्यक
* दुपारच्या उन्हात बाहेर पडणे टाळावे
* पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला
आगामी आठवडा 'कठीण'
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील आठवडाभर राज्यात उष्णतेचा तडाखा कायम राहण्याची शक्यता आहे. एप्रिल अखेर आणि मे महिन्याच्या सुरुवातीलाही उष्णतेची तीव्रता अधिक वाढेल, असा अंदाज आहे.
अवकाळी पावसानंतर आता महाराष्ट्रात उष्णतेचा कहर सुरू होणार असून, नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे अत्यावश्यक झाले आहे.
Web Summary : After unseasonal rains, Maharashtra faces a heatwave with temperatures expected to soar to 42°C in Marathwada, Vidarbha, and central Maharashtra. Citizens and farmers are advised to take precautions against the intense heat.
Web Summary : बेमौसम बारिश के बाद, महाराष्ट्र में भीषण गर्मी की लहर का सामना करना पड़ रहा है, जिसमें मराठवाड़ा, विदर्भ और मध्य महाराष्ट्र में तापमान 42 डिग्री सेल्सियस तक पहुंचने की उम्मीद है। नागरिकों और किसानों को अत्यधिक गर्मी से सावधानी बरतने की सलाह दी जाती है।