Join us

राज्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा वाढला का? कमी झाला? जाणून घ्या सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 12:31 IST

Maharashtra Dam Water Storage राज्यातील धरणांचा पाणीसाठा वाढलाय का? राज्यातील प्रमुख धरणांत किती पाणी आहे, हे जाणून घेऊया.

मागील महिन्यात राज्यातील अनेक भागात अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. अजून देखील काही भागात पाऊस पडतो आहे.

मात्र काही भागात काहीशी उघडीप दिली आहे. ह्या पावसादरम्यान धरणांचापाणीसाठा वाढलाय का? राज्यातील प्रमुख धरणांत किती पाणी आहे, हे जाणून घेऊया.

राज्यातील सर्व प्रमुख धरणात गेल्या वर्षीच्या तुलनेत चांगला पाणीसाठा असल्याचे चित्र दिसत आहे. राज्यातील प्रमुख धरणांचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे

धरणाचे नावसध्याचा पाणीसाठा (टीएमसी)गेल्या वर्षीचा पाणीसाठा (टीएमसी)
गोसीखुर्द४.६४८.६७
तोतलाडोह१८.७९१८.१४
ऊर्ध्व वर्धा८.८५८.८७
जायकवाडी२२.६०२.९९
मांजरा१.६३०.००
ऊर्ध्व तापी हातनूर५.३२२.६३
गंगापूर२.५०२.४८
कोयना१७.३६१०.००
खडकवासला०.८४१.०३
उजनी१८.७२०.००
भातसा९.९५८.१७
धामणी३.१११.७७

अधिक वाचा: मोसमी पावसाला पोषक वातावरण; पुढील ३-४ दिवसात राज्यात या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता

टॅग्स :धरणपाणीमहाराष्ट्रउजनी धरणकोयना धरणजायकवाडी धरणपाऊस