Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >हवामान > शेतकरी बांधवांनो, पाणी वापराचे योग्य नियोजन करा; कडक उन्हामुळे बाष्पीभवनाचा दर वाढला

शेतकरी बांधवांनो, पाणी वापराचे योग्य नियोजन करा; कडक उन्हामुळे बाष्पीभवनाचा दर वाढला

Farmers, plan water usage properly; evaporation rate increased due to hot weather | शेतकरी बांधवांनो, पाणी वापराचे योग्य नियोजन करा; कडक उन्हामुळे बाष्पीभवनाचा दर वाढला

शेतकरी बांधवांनो, पाणी वापराचे योग्य नियोजन करा; कडक उन्हामुळे बाष्पीभवनाचा दर वाढला

हवामानातील बदलत्या परिस्थितीत कडक उन्हामुळे बाष्पीभवनाचा दर वाढल्याचे समोर आले आहे. वेधशाळेच्या नोंदींनुसार शनिवारी पाण्याचे बाष्पीभवन लक्षणीय १५,५ मि.मी. या प्रमाणात झाले असून, यामुळे वातावरणातील कोरडेपणा अधिकच वाढला आहे.

हवामानातील बदलत्या परिस्थितीत कडक उन्हामुळे बाष्पीभवनाचा दर वाढल्याचे समोर आले आहे. वेधशाळेच्या नोंदींनुसार शनिवारी पाण्याचे बाष्पीभवन लक्षणीय १५,५ मि.मी. या प्रमाणात झाले असून, यामुळे वातावरणातील कोरडेपणा अधिकच वाढला आहे.

हवामानातील बदलत्या परिस्थितीत कडक उन्हामुळे बाष्पीभवनाचा दर वाढल्याचे समोर आले आहे. वेधशाळेच्या नोंदींनुसार शनिवारी पाण्याचे बाष्पीभवन लक्षणीय १५,५ मि.मी. या प्रमाणात झाले असून, यामुळे वातावरणातील कोरडेपणा अधिकच वाढला आहे. सध्या अकोला जिल्ह्यातउष्णतेची लाट कायम असून, नागरिकांसह शेतकऱ्यांनाही त्याचा मोठा फटका बसत आहे.

दिवसभर कडक उन्हासोबत स्वच्छ आकाशाची नोंद झाली. आकाश निरभ्र असल्यामुळे सूर्यप्रकाशाचा प्रभाव अधिक जाणवला, तर वाऱ्याचा वेगही मध्यम स्वरूपात होता. मात्र, हवेत आर्द्रतेचे प्रमाण घटल्याने उकाड्याची तीव्रता अधिकच वाढली आहे. परिणामी, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे, थकवा आणि उष्माघाताचा धोका वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, पावसाचा पूर्णतः अभाव असल्यामुळे बाष्पीभवनाची प्रक्रिया अधिक वेगाने होत आहे. याचा थेट परिणाम जमिनीतील ओलाव्यावर होत असून, मातीतील आर्द्रता झपाट्याने कमी होत आहे. विशेषतः उन्हाळी पिकांसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरत आहे. पाण्याची उपलब्धता कमी होत असल्याने पिकांच्या वाढीवर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

शेतकऱ्यांनो पाणी वापराचे योग्य नियोजन करा!

• हंगामाच्या सुरुवातीपासूनच पावसातील तूट कायम असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे जलसाठ्यांवरही ताण वाढत असून, सिंचनासाठी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी पाणी व्यवस्थापनाचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात येत आहे.

• तज्ज्ञांच्या मते, सध्याच्या परिस्थितीत ठिबक व तुषार सिंचनासारख्या पाणी बचतीच्या पद्धतींचा अवलंब करणे, पिकांना आवश्यकतेनुसारच पाणी देणे तसेच मृदा आर्द्रता टिकवून ठेवण्यासाठी आच्छादन (मल्चिंग) वापरणे आवश्यक आहे. तसेच नागरिकांनीही उष्णतेपासून बचावासाठी योग्य काळजी घेणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे.

काही दिवस स्थिती कायम राहणार!

एकूणच, अकोला जिल्ह्यातील वाढती उष्णता, कमी आर्द्रता आणि पावसाचा अभाव यामुळे कोरड्या हवामानाची तीव्रता वाढली असून, येत्या काही दिवसांतही ही स्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे खरीपपूर्व पेरणी करताना शेतकऱ्यांनी योग्य ती खबरदारी घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा : तुम्हालाही नैसर्गिक गरजेपेक्षा अधिक घाम येतो का? काळजी घ्या; गंभीर आजरांचा धोका अधिक

Web Title : बढ़ती गर्मी के बीच किसानों को जल प्रबंधन की सलाह

Web Summary : अकोला में भीषण गर्मी से वाष्पीकरण बढ़ रहा है, जिससे फसलों के लिए पानी की उपलब्धता प्रभावित हो रही है। किसानों को ड्रिप सिंचाई और मल्चिंग का उपयोग करके पानी बचाने की सलाह दी जाती है। नागरिकों को लू से बचने के लिए सावधानी बरतनी चाहिए क्योंकि शुष्क स्थिति बनी रहने की उम्मीद है।

Web Title : Farmers Urged to Manage Water Wisely Amid Rising Heat

Web Summary : Akola faces rising evaporation due to intense heat, impacting water availability for crops. Farmers are advised to use drip irrigation and mulching to conserve water. Citizens should take precautions against heatstroke as dry conditions are expected to persist.