Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > 'या' तीन जिल्ह्यांना मिळणार ९१३ कोटी रुपयांचा निधी; अतिवृष्टी मदत

'या' तीन जिल्ह्यांना मिळणार ९१३ कोटी रुपयांचा निधी; अतिवृष्टी मदत

These three districts will get Rs 913 crore fund; Heavy rain relief | 'या' तीन जिल्ह्यांना मिळणार ९१३ कोटी रुपयांचा निधी; अतिवृष्टी मदत

'या' तीन जिल्ह्यांना मिळणार ९१३ कोटी रुपयांचा निधी; अतिवृष्टी मदत

राज्य सरकारने आपत्ती व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून राज्यातील तीन जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची झालेली हानी पाहता मदत निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.

राज्य सरकारने आपत्ती व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून राज्यातील तीन जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची झालेली हानी पाहता मदत निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.

राज्य सरकारने आपत्ती व पुनर्वसन विभागाच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर, जालना आणि वर्धा जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची झालेली हानी पाहता मदत निधी मंजूर केला आहे. या निधीमुळे बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे.

सरकारच्या ३१ हजार कोटी रुपयांच्या पॅकेजच्या योजनेअंतर्गत ही रक्कम वितरित केली जात असून यामध्ये जलसंपदा, कृषी, रस्ते आणि अन्य इन्फ्रास्ट्रक्चर पुनर्बांधणीसाठी अतिरिक्त निधी दिला जाण्याची शक्यता आहे. यामुळे तातडीने पुनर्वसनाची प्रक्रिया सुरु होईल आणि लोकांच्या रोजच्या जीवनाची गती पुन्हा प्रारंभ होईल.

राज्य सरकारच्या या पाऊलामुळे नक्कीच शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून संकटाच्या काळात त्यांना आर्थिक सहाय्य आणि संसाधनांची आवश्यकता पूर्ण होईल. तसेच या मदत निधीचा योग्य वापर सुनिश्चित करण्यासाठी सरकार संबंधित विभागांना प्रभावीपणे लक्ष ठेवण्यास सांगणार आहे.

तीन जिल्ह्यांसाठी दिलेला ९१३ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. शेतकऱ्यांना तत्काळ हे पैसे मिळावेत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनीही सर्व जिल्हातील प्रशासनाला निधी वाटपात दिरंगाई करू नये असे निर्देश दिले आहेत. - मकरंद जाधव-पाटील, मदत व पुनर्वसनमंत्री.

कोणत्या जिल्ह्यासाठी किती मदत ?

जिल्हा शेतकरी बाधित क्षेत्र (हेक्टर)मदतनिधी
छत्रपती संभाजीनगर६,४४,६४९ ५,१९,४६४४८०.१७ कोटी
जालना ५,४५,८९० ३,८०,२६३ ३५६.६६ कोटी 
वर्धा ७२,२६० ८९,९८३,३९ ७६.५७ कोटी 

हेही वाचा : पत्नीचे दागिने मोडून तरुण शेतकऱ्याची पुरग्रस्तांना मदत; माटाळा येथील ज्ञानेश्वर शिंदेंचे होतंय सर्वत्र कौतुक

Web Title : बारिश से प्रभावित तीन जिलों के लिए ₹913 करोड़ की राहत राशि मंजूर

Web Summary : महाराष्ट्र सरकार ने भारी बारिश से प्रभावित छत्रपति संभाजीनगर, जालना और वर्धा के किसानों के लिए ₹913 करोड़ मंजूर किए। इस सहायता का उद्देश्य बुनियादी ढांचे का पुनर्निर्माण करना और प्रभावित किसानों को तत्काल वित्तीय राहत प्रदान करना है, जिससे कुशल संसाधन आवंटन सुनिश्चित हो सके।

Web Title : ₹913 Crore Relief Fund Approved for Three Rain-Hit Districts

Web Summary : Maharashtra government sanctions ₹913 crore for farmers in Chhatrapati Sambhajinagar, Jalna, and Wardha affected by heavy rains. This aid, part of a larger package, aims to rebuild infrastructure and provide immediate financial relief to affected farmers, ensuring efficient resource allocation.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.