अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत २०२५ च्या खरीप हंगामातील पिकांसाठी ११८.६३ कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी दिली.
जिल्ह्यातील सुमारे २ लाख २३ हजार शेतकऱ्यांनी खरीप हंगाम २०२५ मध्ये पीक विमा योजनेत सहभाग नोंदविला होता. त्यानुसार २.३९ लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचा विमा उतरविण्यात आला होता.
पीक विमा योजनेत अधिसूचित केलेल्या पिकांचे दुष्काळ, नैसर्गिक आपत्ती, कीड व रोग आदी कारणांनी नुकसान झाल्यास पीक कापणी प्रयोगावर आधारित येणाऱ्या उत्पन्नानुसार नुकसानभरपाई देण्याची तरतूद या योजनेमध्ये आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेंतर्गत ११८.६३ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
कापूस व कांदा पिकांबाबत पाठपुरावा
काही तालुक्यांतील भरपाईबाबतची परिगणना अद्याप प्रगतिपथावर आहे. कापूस व कांदा पिकांच्या नुकसान भरपाईबाबत प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे मंत्री विखे-पाटील यांनी सांगितले.
तालुकानिहाय विमा रक्कम
नगर - ५ कोटी ३ लाख.
अकोले - १ कोटी १७ लाख.
जामखेड - १७ कोटी ७१ लाख.
कर्जत - ८९ हजार.
कोपरगाव -९ कोटी ६६ लाख.
नेवासा - २२ कोटी ६८ लाख.
पारनेर - २१ कोटी ७२ लाख.
पाथर्डी - १ कोटी ४० लाख.
राहाता - १३ कोटी ९२ लाख.
राहुरी - ६ कोटी २४ लाख.
शेवगाव - १ कोटी ७ लाख.
श्रीरामपूर - १७ कोटी ९६ लाख.
