Lokmat Agro >शेतशिवार > Ranbhajya : पावसाळ्यात येणाऱ्या सर्वगुणसंपन्न सात रानभाज्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर

Ranbhajya : पावसाळ्यात येणाऱ्या सर्वगुणसंपन्न सात रानभाज्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर

Ranbhajya : What are the seven all-purpose wild vegetables that come during the monsoon? Find out in detail | Ranbhajya : पावसाळ्यात येणाऱ्या सर्वगुणसंपन्न सात रानभाज्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर

Ranbhajya : पावसाळ्यात येणाऱ्या सर्वगुणसंपन्न सात रानभाज्या कोणत्या? जाणून घ्या सविस्तर

Ranbhajya पावसाळ्यात विशेषतः अनेक प्रकारच्या रानभाज्या नैसर्गिकरित्या उगवतात. या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी असतात.

Ranbhajya पावसाळ्यात विशेषतः अनेक प्रकारच्या रानभाज्या नैसर्गिकरित्या उगवतात. या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी असतात.

शेअर :

Join us
Join usNext

पावसाळ्यात विशेषतः अनेक प्रकारच्या रानभाज्या नैसर्गिकरित्या उगवतात. या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठीही अत्यंत गुणकारी असतात. त्यांच्यातील औषधी गुणधर्मामुळे त्यांना पारंपरिक आहारात महत्त्वाचे स्थान आहे.

१) कुरडू
ही भाजी एक सामान्य रानभाजी असून ती शेतात आणि पडिक जमिनीत सहज उगवते. याची पाने गोलाकार किंवा लांबट असतात. औषधी गुणधर्मासाठीही महत्त्वाची असते. ही भाजी पचायला हलकी असते आणि पित्तनाशक मानली जाते. त्वचाविकार आणि चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरते. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. याच्या बियांचा उपयोग अतिसार, नेत्ररोग, रक्तदोष, मूत्ररोग यांवर केला जातो.

२) टाकळा
ही भाजी एक झुडूपवर्गीय वनस्पती असून पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दिसते. त्वचा रोगांवर उदाहारणार्थ खरूज, गजकर्ण, इसब, अॅलर्जी यासाठी अत्यंत फायदेशीर मानला जातो. याच्या पानांचा लेप किंवा भाजी त्वचा विकारांवर गुणकारी असते. पोटातील कृमी कमी करण्यास, पित्त, श्वास, खोकला आणि हृदयविकारांवरही ही भाजी उपयुक्त आहे.

३) दिंडा
ही भाजी पावसाळ्यात उगवणारी एक रानभाजी आहे. दिंडा रक्ताच्या वाढीसाठी पोषक मानली जाते. त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. ती गुणाने उष्ण असून शरीरातील वात आणि कफदोष कमी करण्यास मदत करते. पोटातील जखमा बरी करण्यासाठीही ती उपयुक्त मानली जाते.

४) फांगूळ
ही भाजी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. फांगूळ जीवनसत्त्व 'क'चा चांगला स्रोत आहे. गोवर, कांजण्या, नेत्रविकार, पित्तविकार आणि मूळव्याधीमध्ये पथ्यकर मानली जाते. त्वचेतील दाह आणि उष्णता कमी करण्यास उपयुक्त आहे. ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि जीवनसत्त्व 'अ' मुबलक प्रमाणात असल्याने हृदयाचे आणि डोळ्यांचे आरोग्य राखण्यास मदत करते, तसेच वजन कमी करण्यासही उपयुक्त आहे.

५) भारंगी
ही भाजी एक बारमाही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. भारंगीची भाजी सर्दी, खोकला, ताप आणि छातीतील कफ कमी करण्यासाठी लाभदायक मानली जाते. श्वसनविकारांवर, दम्यासाठी ही भाजी उपयुक्त आहे. पचनशक्ती सुधारण्यासही मदत करते. सांधेदुखीवरही ही भाजी गुणकारी मानली जाते.

६) कंटोळी
ही भाजी एक वेलवर्गीय वनस्पती असून तिचे फळ कारल्यासारखे दिसते, पण आकाराने लहान असते. कंटोळी अनेक जीवनसत्त्वे आणि फायबरने परिपूर्ण असते. ती अनेक आजारांवर गुणकारी मानली जाते.

७) रानभेंडी
ही भाजी नैसर्गिकरित्या उगवणारी भेंडीसारखी दिसणारी वनस्पती आहे. रानभेंडी अशक्तपणा दूर करण्यास मदत करते आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास उपयुक्त मानली जाते. यात फायबर, प्रथिने आणि लोह भरपूर प्रमाणात असते.

याशिवाय, आघाडा, अंबाडी, कुळमुळी, रानआल, शेऊळ (शेवळे), घोळ आणि काटवल यांसारख्या इतरही अनेक रानभाज्या महाराष्ट्रात आढळतात, ज्यांचे स्वतःचे असे औषधी गुणधर्म आणि आरोग्यदायी फायदे आहेत.

कोणत्याही रासायनिक खतांच्या किंवा कीटकनाशकांच्या वापराशिवाय नैसर्गिकरित्या वाढतात, त्यामुळे त्या आरोग्यासाठी सुरक्षित आणि पौष्टिक मानल्या जातात.

अधिक वाचा: Ranbhaji : मान्सून आधीच पावसाळी रानभाज्यांची बाजारात रेलचेल; माहीतगार खवय्यांची झुंबड

Web Title: Ranbhajya : What are the seven all-purpose wild vegetables that come during the monsoon? Find out in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.