पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना दि. १२ जून, २०२४ रोजीच्या शासन निर्णयान्वयेराज्यात राबविण्यात येत आहे.
त्यानुसार सदर योजनेमध्ये अधिसुचित फळपिकांसाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी तसेच सदर योजनेचा लाभ शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येत आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना दि. १२ जून, ०२२४ रोजीच्या शासन निर्णयान्वये भारतीय कृषि विमा कंपनी, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी, फ्युचर जनरली इन्शुरन्स कंपनी व युनिव्हरसल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यांमार्फत मृग व आंबिया बहारामध्ये अधिसुचित फळपिकांसाठी सन २०२४-२०२५ व २०२५-२६ या दोन वर्षाच्या कालावधीसाठी महाराष्ट्र राज्यात राबविण्यात येत आहे.
मृग बहार सन २०२५ मध्ये संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्ष (क), चिकू, पेरु, सिताफळ व लिंबू या ८ फळपिकांसाठी २६ जिल्ह्यामध्ये तर आंबिया बहार सन २०२५-२६ मध्ये डाळिंब, संत्रा, मोसंबी, काजू, केळी, द्राक्ष, आंबा, पपई व स्टॉबेरी या ९ फळपिकांसाठी ३० जिल्ह्यामध्ये फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या निकषानुसार राबविण्यात येत आहे.
दि. ११ एप्रिल, २०२५ रोजीच्या शासन निर्णयान्वये तसेच दि. १५ मे, २०२५ रोजी पार पडलेल्या राज्यस्तरीय पीकविमा समन्वय समितीमध्ये दिलेल्या सुचनांनुसार कृषि विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या लाभाकरीता शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) दि. १५/०४/२०२५ पासून अनिवार्य करण्यात आलेला आहे.
तद्नुषंगाने पुनर्रचित हवामान आधारीत फळपिक विमा योजना मृग व आंबिया बहार सन २०२५-२६ मध्ये सदर योजनेत सहभागी होण्याकरीता अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक (Farmer ID) अनिवार्य आहे. तरी सर्व शेतकरी बांधवांनी अॅग्रिस्टॅक अंतर्गत शेतकरी ओळखपत्र क्रमांक तात्काळ काढुन घेणेकरीता सुचित करण्यात येत आहे.
पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा (मृग बहार) योजनेत सहभागी होऊन अर्ज करण्यासाठी वेबसाईट. तसेच अधिक माहितीसाठी जवळील कृषी विभागाच्या कार्यालयाला भेट द्या.