पुणे : कृषी विभागाने खरीप हंगाम २०२४ पीक स्पर्धेचा राज्यस्तरीय निकाल नुकताच जाहीर केला असून भात, बाजरी, मका, तूर, मूग आणि उडीद या पिकांमध्ये २०२३ च्या तुलनेत सरासरी उत्पादकता वाढली आहे.
ज्वारी, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या पिकांची उत्पादकता घटली आहे. यंदा भात पिकात सर्वसाधारण गटात तिन्ही पारितोषिके कोल्हापूरच्या तर आदिवासी गटात पहिली दोन पारितोषिके पुणे जिल्ह्यातील पटकावली आहेत.
सोयाबीन पिकात सांगली जिल्ह्याचे शेतकरी अव्वल ठरले तर आदिवासी गटात नांदेड जिल्ह्याचे प्रथम क्रमांक पटकावला आहे.
भात पिकात कोल्हापूर अव्वल- कृषी आयुक्त यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय पीक स्पर्धेचा निकाल समितीने घोषित केला.- भात पिकामध्ये सर्वसाधारण गटात भात पिकामध्ये कोल्हापूर जिल्ह्याने पहिले तीनही क्रमांक पटकावले आहेत.- आदिवासी गटातून दिग्गद गावचे (ता. आंबेगाव) सुरेश विरणक यांनी २५.६६ क्विंटल उत्पादन घेत पहिला तर खडकुंब्रचे (ता. जुन्नर) सुदाम सरोगदे यांनी ८३.२४ क्विंटल उत्पादन घेऊन दुसरा क्रमांक पटकावला आहे.
प्रथम क्रमांक मिळालेले शेतकरी
पीक | सर्वसाधारण गट | आदिवासी गट |
भात | सुरेखा शेणवी (कोल्हापूर) | सुरेश विरणक (पुणे) |
ज्वारी | वसंत शिंदे (जळगाव) | कागड्या नाईक (नंदुरबार) |
बाजरी | शिवाजी चोपडे (सातारा) | सोमनाथ माळी (अहिल्यानगर) |
नाचणी | सुरेश चांदेकर (कोल्हापूर) | प्रकाश निरगुडा (रायगड) |
मका | सोपान करांडे (सोलापूर) | कौतिक चौरे (नाशिक) |
तूर | गोपाळ पाचकवडे (सोलापूर) | अमित कुकडे (अमरावती) |
मूग | औंदुबर ढवळे (धाराशिव) | - |
उडीद | चंद्रकांत कोरे (सोलापूर) | रमेश पवार (नाशिक) |
अधिक वाचा: पाऊस पुन्हा सक्रिय; राज्यात पुढील २ दिवसात या ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज