राज्यात जवसाचा पेरा वाढविण्यावर शासनाकडून प्रयत्न केले जात आहे या पृष्ठभूमीवर अकोल्याच्या डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भरपूर उत्पादन देणारे जवसाचे नवे वाण विकसित केले असून, या वाणाला राज्यात लागवडीसाठीची मान्यता मिळाली आहे.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पीडीकेव्ही-शारदा जवसाचे नवे भरघोस उत्पादन देणारे वाण विकसीत केले आहे हे वाण संपूर्ण महाराष्ट्र राज्यसाठी प्रसारित करण्यात आले आहे. सध्या उपलब्ध जवस बियाण्यांपेक्षा पीडीकेव्ही-शारदा बियाण्याचे उत्पादन अधिक आहे.
विविध संशोधन केंद्राच्या प्रक्षेत्रावर झालेल्या चाचणीत १०.१९ क्विंटल प्रतिहेक्टरी उत्पादन मिळाले आहे. त्यात प्रतिक्विंटल ३७.५ टक्के तेलाचे प्रमाण असून, मर रोगाला मध्यमप्रतिकारक आहे. हे बियाणे सर्वच पातळ्यांवर 'एक नंबर'वर आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या निकषाचा अहवाल अद्याप प्राप्त व्हायचा आहे.
जवसाचे मूल्यवर्धन शेतकऱ्यांना फायदेशीर
प्रचंड आरोग्यदायी असलेल्या जवसाच्या ताटापासून उत्तम प्रतीचा थागा तयार केला जात असून, या ताटाला पाच ते आठ रुपये किलो याप्रमाणे दर मिळातोय, यामुळे शेतकऱ्यांना जवस तसेच ताटापासूनदेखील शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो.
उत्पादकता वाढविण्यात यश
राज्यात जवसाचे केवळ सहा हजार हेक्टर क्षेत्र जवसाचे आहे; परंतु डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने प्रामुख्याने विदर्भात ५५० च्यावर प्रात्यक्षिके घेऊन भातपाड क्षेत्रावर जवसाची पेरणी वाढविले असून, उत्पादकता जी हेक्टरी २५७ किलो प्रतिहेक्टरी येत होती आता मोठ्या प्रमाणात वाढली असून, प्रतिकिलो हेक्टरी ४५७ किलो झाली आहे त्यामुळे जवस पेरणीकडेशेतकरी वळला आहे.
नवीन विकसीत जवसाच्या पाडीकेव्ही-शारदा वाणाला मान्यता मिळाली असून, इतर वाणाच्या तुलनेत या वाणाचे उत्पादन अधिक आहे. जवसाची उत्पादकताही वाढली आहे. मार्गदर्शनामुळे शेतकरी या पिकाकडे वळत आहेत. - बिना नायर, जवस पैदासकार, अखिल भारतीय समन्वयीत जवस व मोहरी प्रकल्प, कृषी महाविद्यालय, डॉ पंदेकृवि, नागपूर.