Krishna River Project : १८ वर्षांपासून रखडलेला टप्पा ६ अखेर राजकीय प्राधान्याच्या प्रतीक्षेत. मराठवाड्याच्या दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी जीवनरेषा ठरू शकणारा हा टप्पा सरकारच्या दुर्लक्षामुळे अंधारात आहे. (Krishna River Project)
अनिल जगताप यांची मागणी ही स्थानिक शेतकऱ्यांच्या भावनांची व दैनंदिन वास्तवाची तीव्र अभिव्यक्ती आहे. राज्य शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, ही जनतेची अपेक्षा आहे.(Krishna River Project)
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पातील सहावा टप्पा अद्यापही प्राधान्य यादीत न घेतल्यामुळे स्थानिक शेतकरी संतप्त आहेत.(Krishna River Project)
या टप्प्याच्या कामासाठी निविदा प्रक्रियाही अद्याप सुरू झालेली नाही. त्यामुळे या टप्प्याचे काम कधी सुरु होईल याबाबतही संभ्रमाचे वातावरण आहे.
सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी नुकतीच ही बाब राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या निदर्शनास आणून देत तातडीने टप्पा ६ चा समावेश प्राधान्य यादीत करावा, अशी मागणी केली आहे.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाच्या सहाव्या टप्प्याची निविदा प्रक्रिया राबवण्यासाठी तातडीची गरज आहे. राजकीय इच्छाशक्ती अभावी हे काम वर्षानुवर्षे लांबले जात आहे. राज्य शासनाने याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे.
टप्पा ६ मध्ये कोणकोणते भाग?
तुळजापूर, लोहारा, उमरगा तालुके
लोहारा तालुक्यातील माळेगाव, विलासपूर पांढरी येथून पाणी नेऊन उमरग्यातील तुरोरी येथे पोहोचवण्याची योजना आहे
प्रकल्प मंजुरी व सिंचन क्षेत्र
२३ ऑगस्ट २००७ रोजी प्रकल्पास शासन मान्यता मिळाली.
धाराशिव जिल्ह्यातील - २५,७९८ हेक्टर
बीड जिल्ह्यातील - ८,१४७ हेक्टर
एकूण सिंचन क्षेत्र - ३३,९४५ हेक्टर
१८ वर्षांत केवळ ५ टप्पे
टप्पा १ ते ५ पर्यंतचे काम पूर्ण झाले असून रामदरा, ता. तुळजापूर येथे पाणी पोहोचले आहे
पण टप्पा ६ रखडलेला आहे. या टप्प्याची निविदा प्रक्रियेचाही प्रारंभ झालेला नाही
प्रकल्प खर्चात ६-१० पट वाढ
वर्ष | अंदाजित खर्च (कोटी रुपयांमध्ये) |
२००७ | २,३८२.५० कोटी (मूळ) |
२००९ | ४,२१०.५९ कोटी (प्रथम सुधारित) |
२०२२ | ११,७२६.९१ कोटी (द्वितीय सुधारित) |
भूसंपादन, पर्यावरण, पूल बांधणी, दळणवळण व्यवस्था, वृक्षारोपण आदी घटकांमुळे खर्चात प्रचंड वाढ झाली आहे.
माहिती अधिकारातून खुलासा
अनिल जगताप यांनी माहिती अधिकारातून मिळवलेल्या दस्ताऐवजांच्या आधारे शासनाच्या दुर्लक्षाचे अनेक मुद्दे समोर आणले आहेत.
किती वर्ष लागणार? शेतकऱ्यांचा सवाल
१८ वर्षांत केवळ पाच टप्पे पूर्ण
टप्पा ६ रखडल्याने तुळजापूर, लोहारा, उमरग्यातील हजारो शेतकऱ्यांचे भवितव्य अंधारात
दरवर्षी समुद्रात वाहून जाणारे कृष्णेचे ४० टीएमसी पाणी जर या भागात वळवले गेले, तर दुष्काळाचा प्रश्न कायमचा सुटू शकतो.