Lokmat Agro >शेतशिवार > Jaltara Yojana : वाशिमचा जलक्रांतीचा संकल्प; ४१ हजार शोषखड्डे तयार; पाणी अडवा, भविष्य वाचवा! वाचा सविस्तर

Jaltara Yojana : वाशिमचा जलक्रांतीचा संकल्प; ४१ हजार शोषखड्डे तयार; पाणी अडवा, भविष्य वाचवा! वाचा सविस्तर

latest news Jaltara Yojana: 'Jaltara' has shown its promise in Washim! Groundwater will be visible in winter, read the results in detail | Jaltara Yojana : वाशिमचा जलक्रांतीचा संकल्प; ४१ हजार शोषखड्डे तयार; पाणी अडवा, भविष्य वाचवा! वाचा सविस्तर

Jaltara Yojana : वाशिमचा जलक्रांतीचा संकल्प; ४१ हजार शोषखड्डे तयार; पाणी अडवा, भविष्य वाचवा! वाचा सविस्तर

Jaltara Yojana : पावसाळा तोंडावर असताना जलसंपत्ती वाचवण्याचे ठोस पाऊल उचलत वाशिम जिल्ह्यात 'जलतारा' अभियानाने दमदार कामगिरी केली आहे. तब्बल ४१ हजारांहून अधिक शोषखड्ड्यांची निर्मिती करत भूजल वाढीचा मजबूत पाया केला आहे. वाचा सविस्तर (Jaltara Yojana)

Jaltara Yojana : पावसाळा तोंडावर असताना जलसंपत्ती वाचवण्याचे ठोस पाऊल उचलत वाशिम जिल्ह्यात 'जलतारा' अभियानाने दमदार कामगिरी केली आहे. तब्बल ४१ हजारांहून अधिक शोषखड्ड्यांची निर्मिती करत भूजल वाढीचा मजबूत पाया केला आहे. वाचा सविस्तर (Jaltara Yojana)

शेअर :

Join us
Join usNext

Jaltara Yojana : पावसाळा तोंडावर असताना जलसंपत्ती वाचवण्याचे ठोस पाऊल उचलत वाशिम जिल्ह्यात 'जलतारा' अभियानाने दमदार कामगिरी केली आहे. तब्बल ४१ हजारांहून अधिक शोषखड्ड्यांची निर्मिती करत भूजल वाढीचा मजबूत पाया केला आहे. (Jaltara Yojana)

राज्यातील जलसंपत्ती वाचवण्यासाठी 'जलतारा' अभियान राबवले जात असतानाच वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आणि प्रशासनाने एक पाऊल पुढे टाकत ४१ हजार ३८६ शोषखड्डे पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, वाशिम तालुक्याने ११ हजार ००१ खड्ड्यांची ऑनलाइन नोंदणी करत जिल्ह्यात सर्वाधिक कामगिरी बजावली आहे. (Jaltara Yojana)

या उपक्रमाअंतर्गत पावसाचे पाणी वाहून न देता जमिनीत मुरवण्यासाठी ५x५ फूट क्षेत्रफळ आणि ६ फूट खोल शोषखड्डे खोदले जात आहेत.  (Jaltara Yojana)

या प्रत्येक खड्ड्यासाठी शासनामार्फत ४ हजार ८०० रुपये मजुरी अनुदान मिळणार आहे. जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाने केवळ शासकीय स्तरावर न थांबता, सामाजिक संस्था, स्थानिक जलदूत आणि दानशूर नागरिक यांना सहभागी करून जलचळवळीत रूपांतर घडवून आणले आहे. (Jaltara Yojana)

शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग 

काही शेतकऱ्यांनी स्वतः च्या खर्चाने खड्डे खोदले असून, काही दानशूर व्यक्तींनी जेसीबी मशीन मोफत उपलब्ध करून दिली आहे. या अभियानामुळे विहिरींना पाणी मिळणे, भूजल स्तर वाढणे, शेतीची उत्पादकता सुधारणे, हवामान बदलाचा प्रतिकार करण्याची ताकद मिळणे असे अनेक फायदे होणार आहेत.

पावसाळ्यात खड्ड्यांचे महत्त्व 

पावसाळ्यात या शोषखड्ड्यांमुळे पावसाचे पाणी मुरवले जाईल, आणि त्याचा परिणाम हिवाळ्यात स्पष्ट दिसून येईल, असा विश्वास जलतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. महत्त्वाचे म्हणजे, या अभियानांतर्गत खड्डा खोदण्यासाठी महसूल विभागाशी संपर्क साधावा लागणार आहे, आणि मजुरीसाठी नरेगा अंतर्गत निधी दिला जाणार आहे.

जिल्ह्यातील आघाडीचे तालुके

वाशिम तालुका अव्वल असून, मानोरा तालुक्यात फक्त ५ हजार शोषखड्डे झाले आहेत. यामुळे इतर तालुक्यांनीही गती देणे आवश्यक आहे.

जलस्रोतांचे पुनरुज्जीवन

जलस्रोतांचे पुनरुज्जीवन, भूजल पातळी वाढविण्याचा प्रयत्न म्हणून जलतारा अभियान खूपच उपयुक्त व मौल्यवान ठरणार आहे. या अभियानात सर्वच घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवून जलतारा शोषखड्डे खोदावेत. - सुभाष नानवटे, जलतज्ज्ञ, वाशिम 

हे ही वाचा सविस्तर : Jaltara Yojana : जलतारा योजनेत सहभागी व्हा; अन् ४८०० मिळवा! जाणून घ्या सविस्तर

Web Title: latest news Jaltara Yojana: 'Jaltara' has shown its promise in Washim! Groundwater will be visible in winter, read the results in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.