Fruit Orchard Subsidy : ज्यांच्या शेतात झाडंच नाहीत, त्यांनाही मिळालं अनुदान. नरखेड तालुक्यात संत्रा-मोसंबीच्या नावाखाली कोट्यवधींचा घोटाळा उघड झाला आहे. (Fruit Orchard Subsidy)
सध्या जलना जिल्ह्यातील शेतकरी अनुदानाचे प्रकरण ताजे असतानाच अता नागपूर येथे फळ पिकाच्या अनुदानात मोठा घोटाळा झाल्याचे निदर्शन आले आहे. (Fruit Orchard Subsidy)
नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यात शेतकऱ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या संत्रा आणि मोसंबी पिकाच्या अनुदानात तब्बल १६ कोटी रुपयांचा महाघोटाळा झाल्याचे समोर आले आहे. (Fruit Orchard Subsidy)
या प्रकरणात शेकडो बोगस शेतकऱ्यांनी लाखो रुपयांचे अनुदान घेतल्याचे उघड झाले असून, रोहणा गावात यासोबतच बिनधास्तपणे सुरू असलेल्या वाळू तस्करीचा पर्दाफाश झाला आहे.(Fruit Orchard Subsidy)
अनुदान योजनेत १७८ बोगस लाभार्थी!
नरखेड तालुक्यातील रोहणा शिवारातील ३७८ शेतकऱ्यांना एकूण १ कोटी १९ लाख ३० हजार ७६० रुपये अनुदान देण्यात आले. मात्र त्यातील १७८ शेतकऱ्यांकडे संत्रा वा मोसंबीची झाडेच नव्हती, हे चौकशी अंती सिध्द झाले आहे.
या १७८ जणांनी जवळपास ७८ लाख रुपये
चौकशी सुरू होताच यातील काहींनी रक्कम परत करण्यास सुरुवात केली असून सध्या ५० टक्के वसुली झाल्याची माहिती मिळाली आहे.
पाहणीशिवाय अनुदान वाटप?
शेतकऱ्यांच्या संघटनांनी आरोप केला की, अनुदान यादीत नावं घालण्यासाठी प्रत्यक्ष शेतात पाहणीच झाली नाही. काहींच्या शेतात हे फळपीक नव्हतेच, तरीही अनुदान मिळाले. ग्रामपंचायत सचिव विक्की सिसोदिया यांनी मात्र दावा केला की, पाहणी करूनच यादी तयार झाली आहे. गैरप्रकार नाही.
नदीपात्रात खड्डे, गावकऱ्यांना संकट
अनुदान घोटाळ्याच्या तपासासाठी गावात गेलेल्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे सागर दुधाने आणि कार्यकर्त्यांना रोहणा गावात आणखी एक धक्कादायक प्रकार दिसून आला तो म्हणजे वाळू तस्करीचा.
नदी बंधाऱ्याचे गेट चोरीला गेले असून प्रशासनाकडून कोणतीही उपाययोजना नाही.
मोकाट माफियांनी रात्रीच्या अंधारात रेती उपसा करून खड्डे तयार केले.
स्थानिक ग्रामस्थ जितेंद्र लोणे आणि सचिन चौधरी यांनी सांगितले की, तक्रारी करूनही तहसीलदार आणि प्रशासनाने दुर्लक्ष केले.
संपत्तीची SIT चौकशी करा
शेतकरी नेते सागर दुधाने यांनी महसूल मंत्री यांच्याकडे तहसीलदार आणि पाच कर्मचाऱ्यांच्या संपत्तीची एसआयटी चौकशीची मागणी केली असून, शेतकऱ्यांच्या हक्कांवर डल्ला मारणाऱ्या अधिकाऱ्यांना माफ केला जाणार नाही, असा इशाराही दिला आहे.
पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न
वाळू उपशामुळे नदीपात्रात खड्डे पडले असून, पाण्याचा प्रवाह अडवल्यामुळे गावात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
ग्रामस्थांनी सांगितले की, मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठी आवश्यक जागाही समतल राहणार नाही. इतपत भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे.
* १६ कोटी रुपयांचा अनुदान घोटाळा : १७८ बोगस लाभार्थी
* वाळू माफियांचा कहर : प्रशासन गप्प
* गावकऱ्यांची तक्रारी ऐकण्यास अधिकारी तयार नाहीत
* शेतकरी संघटनांकडून SIT चौकशीची जोरदार मागणी