Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Chilli export to Dubai : सिल्लोडची मिरची झाली इंटरनॅशनल; बांगलादेश, दुबईत वाढली मागणी

Chilli export to Dubai : सिल्लोडची मिरची झाली इंटरनॅशनल; बांगलादेश, दुबईत वाढली मागणी

latest news Chilli export to Dubai : Sillod's Chilli International; Increased demand in Bangladesh, Dubai | Chilli export to Dubai : सिल्लोडची मिरची झाली इंटरनॅशनल; बांगलादेश, दुबईत वाढली मागणी

Chilli export to Dubai : सिल्लोडची मिरची झाली इंटरनॅशनल; बांगलादेश, दुबईत वाढली मागणी

Chilli export to Dubai : सिल्लोड तालुक्यातील हिरव्या तिखट मिरचीने आता देशासह विदेशातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दुबई आणि बांगलादेशापर्यंत सिल्लोडच्या मिरचीची निर्यात होत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर मिरची लागवडीकडे वळले आहेत. वाढत्या मागणीमुळे यंदा लागवड क्षेत्रात तब्बल तिपटीने वाढ झाली असली तरी कडक ऊन आणि पाणीटंचाईमुळे रोपे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू आहे.(Chilli export to Dubai)

Chilli export to Dubai : सिल्लोड तालुक्यातील हिरव्या तिखट मिरचीने आता देशासह विदेशातही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. दुबई आणि बांगलादेशापर्यंत सिल्लोडच्या मिरचीची निर्यात होत असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणावर मिरची लागवडीकडे वळले आहेत. वाढत्या मागणीमुळे यंदा लागवड क्षेत्रात तब्बल तिपटीने वाढ झाली असली तरी कडक ऊन आणि पाणीटंचाईमुळे रोपे वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची मोठी धडपड सुरू आहे.(Chilli export to Dubai)

श्यामकुमार पुरे

सिल्लोड तालुक्यातील हिरव्या तिखट मिरचीने आता देशासह विदेशातही आपली खास ओळख निर्माण केली आहे. (Chilli export to Dubai)

मुंबईसह कर्नाटक, उत्तर प्रदेश, हरियाणा, बिहार या राज्यांत मोठ्या प्रमाणात मागणी असलेल्या सिल्लोडच्या मिरचीची आता बांगलादेश आणि दुबईपर्यंत निर्यात होत आहे.(Chilli export to Dubai)

वाढत्या मागणीमुळे तालुक्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर मिरची लागवडीकडे वळले असून यंदा मिरची आणि आले लागवडीखालील क्षेत्रात तब्बल तिपटीने वाढ झाली आहे.(Chilli export to Dubai)

सिल्लोडच्या मिरचीला विदेशातूनही मागणी

तालुक्यातील अजिंठा, आमठाणा, शिवना, गोळेगाव आणि अंभई परिसरातील मिरचीची गुणवत्ता, तिखटपणा आणि टिकाऊपणामुळे बाजारपेठेत विशेष मागणी आहे. सिल्लोडमधून दररोज मोठ्या प्रमाणावर हिरवी मिरची विविध राज्यांत पाठवली जात आहे.

विशेष म्हणजे, बांगलादेश आणि दुबई येथे जहाजाद्वारे मिरचीची निर्यात होत असल्याने सिल्लोडच्या मिरचीला आंतरराष्ट्रीय बाजारपेठही मिळाली आहे. शिवना आणि गोळेगाव परिसरात तर परराज्यातील व्यापारी थेट शेतकऱ्यांकडून मिरची खरेदी करण्यासाठी ठाण मांडून बसत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

मिरची लागवडीत तिपटीने वाढ

पंचायत समितीचे कृषी अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा मिरची आणि आले लागवडीत मोठी वाढ झाली आहे.

लागवड क्षेत्रातील वाढ

पीकमागील वर्षीयंदा
हिरवी मिरची४ हजार हेक्टर१० हजार हेक्टर
आले (अद्रक)२ हजार हेक्टर७ हजार हेक्टर

१५ मेपर्यंत मिरची लागवड १५ हजार हेक्टरपर्यंत आणि आले लागवड १२ हजार हेक्टरपर्यंत पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मल्चिंग पेपरमुळे वाढले उत्पादन

मिरची लागवडीत मल्चिंग पेपर तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर होत आहे. 

या पद्धतीमुळे पाण्याची बचत होते

तण कमी उगवते

मातीतील ओलावा टिकतो

उत्पादनात वाढ होते

यामुळे शेतकरी पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक शेती तंत्रज्ञान स्वीकारताना दिसत आहेत.

कडक उन्हात रोपे वाचवण्याची कसरत

मिरची लागवडीचा उत्साह वाढला असला तरी निसर्गाचे आव्हान शेतकऱ्यांसमोर उभे आहे. सध्या तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचल्याने कोवळी रोपे कोमेजून जात आहेत.

रोपे जगवण्यासाठी शेतकऱ्यांना दिवसातून तीन वेळा पाणी द्यावे लागत आहे

सावलीची व्यवस्था करावी लागत आहे

पाण्याचे काटेकोर नियोजन करावे लागत आहे

अनेक भागांतील विहिरींनी तळ गाठल्याने पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे.

बोगस बियाणे आणि रोपांचा मोठा धोका

मागील हंगामात तालुक्यातील सुमारे ४० शेतकऱ्यांना बोगस बियाणे आणि रोपांचा फटका बसला होता. झाडांची वाढ चांगली झाली, मात्र त्यांना फुले आणि मिरचीच आली नाही.

विशेष म्हणजे,

केवळ १० ते १२ शेतकऱ्यांनाच भरपाई मिळाली

अनेकांकडे पक्के बिल नसल्याने नुकसानभरपाई नाकारण्यात आली

यामुळे कृषी विभागाने शेतकऱ्यांना अधिकृत आणि परवानाधारक रोपवाटिकेतूनच रोपे खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.

३८ परवानाधारक रोपवाटिका

सिल्लोड तालुक्यात एकूण ३८ परवानाधारक रोपवाटिका आहेत. 

शेतकऱ्यांनी रोपे खरेदीपूर्वी बियाण्याची माहिती तपासावी

पक्के बिल घ्यावे

रोपवाटिका परवानाधारक आहे का ते पाहावे

असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

शेतकऱ्यांनी भविष्यात नुकसान झाल्यास भरपाई मिळण्यासाठी पक्के बिल अत्यंत महत्त्वाचे आहे.- गजानन कुडके,गुण नियंत्रक

सिल्लोडची मिरची बनतेय 'ब्रँड'

देश-विदेशातून वाढती मागणी, उत्पादनातील वाढ आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामुळे सिल्लोडची हिरवी मिरची आता स्वतंत्र कृषी ब्रँड म्हणून उदयास येत आहे. 

मात्र, हवामान बदल, पाणीटंचाई आणि बोगस बियाण्यांचा धोका या आव्हानांवर मात करणे शेतकऱ्यांसाठी तितकेच महत्त्वाचे ठरत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Soybean Seed : सोयाबीन बियाण्यांवर मोठा खर्च टळणार; कृषी विभागाचा खास सल्ला

अधिक वाचा : Soybean Market Update : दर वाढले पण माल संपला; सोयाबीन बाजारात नेमकं काय घडलं?

Web Title : सिल्लोड की मिर्च अंतर्राष्ट्रीय स्तर पर: बांग्लादेश, दुबई में मांग बढ़ी

Web Summary : सिल्लोड की तीखी हरी मिर्च की मांग बढ़ने से अब बांग्लादेश और दुबई को निर्यात हो रही है। किसानों ने मिर्च और अदरक की खेती तीन गुना बढ़ा दी है। पानी की कमी और नकली बीजों जैसी चुनौतियों के बावजूद, सिल्लोड की मिर्च एक ब्रांड के रूप में उभर रही है।

Web Title : Sillod's Chilli Goes International: Demand Surges in Bangladesh, Dubai

Web Summary : Sillod's spicy green chillies are now exported to Bangladesh and Dubai due to high demand. Farmers have tripled chilli and ginger cultivation. Despite challenges like water scarcity and fake seeds, Sillod chillies are emerging as a brand.