Lokmat Agro >शेतशिवार > Avakali Paus: मान्सूनपूर्व पावसाचा थैमान! कारंजा तालुक्यात वीज खंडित, पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

Avakali Paus: मान्सूनपूर्व पावसाचा थैमान! कारंजा तालुक्यात वीज खंडित, पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

latest news Avakali Paus: Pre-monsoon rains cause power outages in Karanja taluka, crop damage Read in detail | Avakali Paus: मान्सूनपूर्व पावसाचा थैमान! कारंजा तालुक्यात वीज खंडित, पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

Avakali Paus: मान्सूनपूर्व पावसाचा थैमान! कारंजा तालुक्यात वीज खंडित, पिकांचे नुकसान वाचा सविस्तर

Avakali Paus : कारंजा तालुक्यात (Karanja Taluka) मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांसह मान्सूनपूर्व (Pre-monsoon) पावसाने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत टाकले आहे. या पावसामुळे घरांचे, पिकांचे आणि वीजपुरवठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक गावांमध्ये वाहतूक ठप्प झाली आहे. (Avakali Paus)

Avakali Paus : कारंजा तालुक्यात (Karanja Taluka) मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांसह मान्सूनपूर्व (Pre-monsoon) पावसाने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत टाकले आहे. या पावसामुळे घरांचे, पिकांचे आणि वीजपुरवठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक गावांमध्ये वाहतूक ठप्प झाली आहे. (Avakali Paus)

शेअर :

Join us
Join usNext

Avakali Paus :  कारंजा तालुक्यात (Karanja Taluka) मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांसह मान्सूनपूर्व (Pre-monsoon) पावसाने शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत टाकले आहे. या पावसामुळे घरांचे, पिकांचे आणि वीजपुरवठ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अनेक गावांमध्ये वाहतूक ठप्प झाली आहे. (Avakali Paus)

विद्युत खांब आणि रोहित्र कोसळल्यामुळे संपूर्ण परिसर अंधारात गेला आहे. उन्हाळी पिकांवर पावसाचे थेट परिणाम जाणवू लागले असून, शेतकरी नुकसानभरपाईसाठी प्रशासन आणि विमा कंपनीकडे धाव घेत आहेत. (Avakali Paus)

कारंजा तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने शहरासह ग्रामीण भागांमध्ये मोठा आर्थिक आणि सामाजिक फटका दिला आहे. पावसामुळे घरांचे, शेतीचे आणि सार्वजनिक पायाभूत सुविधांचे नुकसान झाले असून, अनेक गावांतील वीजपुरवठा पूर्णतः खंडित झाला आहे. (Avakali Paus)

शहरातील मुख्य भागांपासून ते ग्रामीण शिवारांपर्यंत अनेक ठिकाणी पावसाचे पाणी साचल्याने वाहतूक व दैनंदिन व्यवहार ठप्प झाले. विशेषतः नव्याने तयार झालेल्या रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. (Avakali Paus)

पिकांचे नुकसान, शेतकऱ्यांची चिंता वाढली

मान्सूनपूर्व पावसामुळे उन्हाळी उडीद, मूग, हरभरा, कांदा, संत्रा, भुईमूग आणि भाजीपाला या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिकांची मुळे कुजण्याची भीती निर्माण झाली असून, उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.

यासंदर्भात कारंजा तहसीलदार कुणाल झाल्टे यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीची माहिती ७२ तासांच्या आत संबंधित विमा कंपनीला देणे गरजेचे आहे.

प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत नुकसानभरपाई मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी तलाठी, कृषी सहायक किंवा ऑनलाईन पोर्टलवर आपली माहिती नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

वीज खांब व रोहित्र कोसळले; परिसर अंधारात

काजळेश्वर परिसरात वादळी वाऱ्यामुळे गजाननराव भड यांच्या शेतात (सर्वे नं. ११९) विद्युत खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला. या घटनेमुळे येण्या-जाण्याच्या मार्गावर धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे.

तसेच पानगव्हाण शिवारातील प्रभाकर उपाध्ये आणि काजळेश्वर शिवारातील अनिल हेंडस्कार यांच्या शेतातही वादळामुळे विद्युत रोहित्र कोसळले, त्यामुळे दोन्ही गावांतील वीज सेवा पूर्णतः ठप्प झाली आहे.

या घटनेमुळे शेतीच्या सिंचनावर व घरगुती कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. नागरिकांनी महावितरण कार्यालयाकडे तातडीने विद्युत रोहित्र व खांब पुनर्स्थापित करण्याची लेखी मागणी केली आहे.

नुकसान भरपाई मिळावी

संपूर्ण परिस्थितीचा विचार करता प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लवकरात लवकर पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे.

दरम्यान, अजूनही काही भागांमध्ये वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही, तर हवामान विभागाकडून पुढील काही दिवस वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आल्याने तालुक्यातील शेतकरी व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

हे ही वाचा सविस्तर : Avakali Paus: पिकं गेली, स्वप्नं विरली… आता पंचनाम्याचीच आशा वाचा सविस्तर
 

अधिक माहितीसाठी हे ही वाचा Avakali Paus: शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी… पण वेळेआधी आल्याने झाली हानी वाचा सविस्तर

Web Title: latest news Avakali Paus: Pre-monsoon rains cause power outages in Karanja taluka, crop damage Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.