Lokmat Agro >शेतशिवार > Avakali Paus: पिकं गेली, स्वप्नं विरली… आता पंचनाम्याचीच आशा वाचा सविस्तर

Avakali Paus: पिकं गेली, स्वप्नं विरली… आता पंचनाम्याचीच आशा वाचा सविस्तर

latest news Avakali Paus: Crops gone, dreams shattered… Now the hope of Panchnama Read in detail | Avakali Paus: पिकं गेली, स्वप्नं विरली… आता पंचनाम्याचीच आशा वाचा सविस्तर

Avakali Paus: पिकं गेली, स्वप्नं विरली… आता पंचनाम्याचीच आशा वाचा सविस्तर

Avakali Paus : मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे. उन्हाळी कांद्यासह भाजीपाला, ज्वारी, भुईमूग, बाजरी यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आता पंचनाम्याची (Panchnama) आणि नुकसानभरपाईची आशा बाळगून आहेत. वाचा सविस्तर (Avakali Paus)

Avakali Paus : मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे. उन्हाळी कांद्यासह भाजीपाला, ज्वारी, भुईमूग, बाजरी यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आता पंचनाम्याची (Panchnama) आणि नुकसानभरपाईची आशा बाळगून आहेत. वाचा सविस्तर (Avakali Paus)

शेअर :

Join us
Join usNext

Avakali Paus : मान्सूनपूर्व पावसाच्या सरींनी वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरवले आहे. उन्हाळी कांद्यासह भाजीपाला, ज्वारी, भुईमूग, बाजरी यासारख्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शेतकरी आता पंचनाम्याची (Panchnama) आणि नुकसानभरपाईची आशा बाळगून आहेत.(Avakali Paus)

मे महिन्यात सुरू झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांना प्रचंड फटका बसला आहे. सततच्या पावसामुळे ज्वारी, बाजरी, भुईमूग, कांदा, तसेच विविध प्रकारच्या भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.(Avakali Paus)

विशेषतः उन्हाळी कांद्याचे पीक सडल्याने अनेक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, डोळ्यांत अश्रू घेऊन त्यांनी पंचनाम्यांची (Panchnama) मागणी केली आहे.(Avakali Paus)

पिके सडली, मेहनत वाया!

फुलउमरी येथील शेतकरी भिलोस राठोड यांनी सांगितले की, “मी ज्वारी, बाजरी व भुईमूग पेरली होती, पण सततच्या पावसामुळे सगळी पिके सडून गेली. बियाणे, खते, औषधे यावर झालेला सगळा खर्च वाया गेला. आता खरीप हंगामासाठी शेतीची मशागतही अडचणीत आली आहे.

कांदा पिकाला सर्वाधिक फटका

तालुक्यात अनेक भागांत कांद्याची काढणी पूर्ण झाली होती. काही ठिकाणी कांदा साठवणुकीसाठी ठेवलेला असताना अचानक पावसामुळे भिजून खराब झाला. या नासधूस झालेल्या कांद्यामुळे शेतकऱ्यांचे हजारो रुपये खर्च वाया गेले आहेत.

नुकसानग्रस्त गावांची यादी

पोहरादेवी, उमरी बु., उमरी खुर्द, शेंदोना, वाई गौळ, फुलउमरी, रतनवाडी, सोमेश्वर नगर, आमदरी, शिवणी, हातोली, हातना आणि माहुली या गावांत सर्वाधिक नुकसान झाले असून, बहुतांश शेतकरी हवालदिल झाले आहेत.

शेती मशागतीवर मर्यादा

मे महिन्यात नांगरणी, खत टाकणे व मशागत करणे आवश्यक असते. मात्र सततचा ओलसर हवामानाचा परिणाम म्हणून ही सर्व कामे ठप्प झाली आहेत. याचा थेट परिणाम खरीप पेरणीवर होण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांची मागणी : तात्काळ पंचनामे करा!

शेतकऱ्यांनी महसूल व कृषी विभागाकडे नुकसानग्रस्त भागांचे तात्काळ पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची जोरदार मागणी केली आहे. पिकांचे नुकसान पाहता शासनाने त्वरीत निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Avakali Paus: शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी… पण वेळेआधी आल्याने झाली हानी वाचा सविस्तर

Web Title: latest news Avakali Paus: Crops gone, dreams shattered… Now the hope of Panchnama Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.