Agricultural Production : गेल्या पाच वर्षांत सोयाबीन, मका, मूग आणि उडीद या पिकांच्या उत्पादनात वाढ झाली असली तरी, पारंपरिक पिकांचं क्षेत्र कमी झालं आहे. बाजारपेठ, खर्च आणि हवामानाचा फटका शेतकऱ्यांच्या निवडींवर परिणाम करत आहे. (Agricultural Production)
जागतिक उत्पादकता दिनानिमित्त, विदर्भातील पिकांची स्थिती आणि कल बदलताना दिसत आहे. कृषी क्षेत्राकडे नजर टाकल्यास, गेल्या पाच वर्षांत खरीप हंगामातील अनेक पिकांच्या उत्पादकतेत लक्षणीय वाढ झाली आहे. (Agricultural Production)
विशेषतः सोयाबीन आणि मका यांसारख्या पिकांना शेतकऱ्यांकडून अधिक पसंती मिळत आहे. मात्र, काही पारंपरिक पिकांच्या लागवडीखालील क्षेत्रात मोठी घट झाली असून, ही बाब चिंतेची ठरत आहे. (Agricultural Production)
या वाढत्या उत्पादकतेच्या काळात, शेतकऱ्यांचे आर्थिक हित आणि टिकाऊ शेतीचे धोरण हेच खऱ्या अर्थाने उत्पादकता दिनाचे ध्येय ठरावे.
पाच वर्षांतील उत्पादकतेतील बदल (किलो/हेक्टर)
पीक | २०२०-२१ | २०२४-२५ | वाढ/घट (किलो) |
---|---|---|---|
सोयाबीन | १४७३ | १५१८ | +४५ |
तूर | ११७६ | ११३८ | -३८ |
मूग | ४६६ | ७६८ | +३०२ |
उडीद | ६११ | ८२१ | +२१० |
खरीप ज्वारी | ११८८ | १२८० | +९२ |
मका | ३०१९ | ३१७९ | +१६० |
उत्पादनात वाढ; क्षेत्रात घट!
विदर्भातील पारंपरिक नगदी पीक कापसाची उत्पादकता सध्या प्रतिहेक्टर ४४७ रुपये इतकी आहे. ही वाढ यांत्रिकीकरण, सुधारित बियाणे, खत आणि सिंचन व्यवस्थापनामुळे शक्य झाली असली, तरी कापूस लागवड क्षेत्र मात्र सतत कमी होत आहे. यामागे बाजारातील अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च आणि दरातील चढ-उतार हे प्रमुख कारण मानले जात आहे.
सोयाबीन, मक्याचे आकर्षण वाढतेय
सोयाबीन व मका ही पिके शेतकऱ्यांसाठी अधिक फायदेशीर ठरू लागली आहेत. त्यामुळे अनेकांनी डाळ वर्गीय पिके जसे की मूग व उडीद टाळून, या पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे.
यामुळे मूग-उडीद यांसारख्या पारंपरिक पिकांचे लागवडीखालील क्षेत्र कमी झाले आहे, जरी त्यांची उत्पादकता वाढलेली असली तरी.
डाळ पिकांना अस्थिर बाजारपेठेचा फटका
मूग, उडीद आणि ज्वारी यांसारख्या पिकांचे उत्पादन वाढले असले तरी, या पिकांच्या भावात सातत्य नसल्यामुळे शेतकरी या पिकांकडे पाठ फिरवत आहेत. कमी कालावधीत तयार होणारी ही पिके बाजारभावानुसार अधिक प्रभावित होतात, त्यामुळे शाश्वत उत्पन्नासाठी शेतकरी अधिक स्थिर बाजार असलेल्या पिकांकडे वळत आहेत.
उत्पादकतेचा वाढता कल
राज्यातील कृषी धोरणकर्त्यांसाठी ही स्थिती एकीकडे संधी आहे, तर दुसरीकडे आव्हानही. उत्पादन वाढत असले तरी शेतकऱ्यांच्या निवडीवर बाजारभाव, खर्च, आणि धोरणांचा मोठा परिणाम होत आहे. यासाठी संपूर्ण पिक व्यवस्थापन, बाजारभावाचा स्थैर्य आणि सेंद्रिय दृष्टिकोन यांचा समावेश असलेले धोरण तयार करणे गरजेचे आहे.
हे ही वाचा सविस्तर : Halad Market : बाजारात हळदीला उतरती कळा; कसा मिळतोय दर वाचा सविस्तर