Lokmat Agro >शेतशिवार > गेल्या चार दिवसांत जळगाव जिल्ह्यातील ८० हजार शेतकऱ्यांची ५७ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

गेल्या चार दिवसांत जळगाव जिल्ह्यातील ८० हजार शेतकऱ्यांची ५७ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

In the last four days, crops of 80,000 farmers on 57,000 hectares in Jalgaon district have been destroyed. | गेल्या चार दिवसांत जळगाव जिल्ह्यातील ८० हजार शेतकऱ्यांची ५७ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

गेल्या चार दिवसांत जळगाव जिल्ह्यातील ८० हजार शेतकऱ्यांची ५७ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त

जळगाव जिल्ह्यात २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान वेगवेगळ्या तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ८ तालुक्यांतील ३२४ गावांमध्ये तब्बल ५७ हजार २८९ हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिके पाण्यात गेली आहेत.

जळगाव जिल्ह्यात २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान वेगवेगळ्या तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ८ तालुक्यांतील ३२४ गावांमध्ये तब्बल ५७ हजार २८९ हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिके पाण्यात गेली आहेत.

शेअर :

Join us
Join usNext

जळगाव जिल्ह्यात २१ ते २३ सप्टेंबरदरम्यान वेगवेगळ्या तालुक्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे ८ तालुक्यांतील ३२४ गावांमध्ये तब्बल ५७ हजार २८९ हेक्टर क्षेत्रावरील खरिपाची पिके पाण्यात गेली आहेत.

गेल्या चार महिन्यांतील सर्वाधिक नुकसान या चार दिवसांत झाल्याचे कृषी विभागाने दिलेल्या अहवालातून समोर आले आहे. ८० हजार शेतकरी यामुळे बाधित झाले आहेत.

गेल्या चार दिवसांत जळगाव जिल्ह्यातील पाचोरा, भडगाव, एरंडोल, जामनेर, जळगाव, भुसावळ, मुक्ताईनगर, पारोळा या तालुक्यांमधील अनेक महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली. ३३ टक्क्यांपेक्षा मोठ्या प्रमाणात खरीप पिकांचे नुकसान झाले आहे.

पावसाचे पाणी शेतांमध्ये जाऊन शेतांमधील पिके अक्षरशः बाहून गेल्याचे चित्र पाहायला मिळाले. याआधी सप्टेंबर महिन्यातच झालेल्या पावसामुळे ४ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते. यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

हेही वाचा : शेतीची वाट निवडली अन् एका रात्रीत उद्ध्वस्त झाली स्वप्नांची दुनिया; करंजीतील तरुण शेतकऱ्याचे हृदयद्रावक वास्तव

Web Title : जलगाँव: भारी बारिश से 57,000 हेक्टेयर में फसलें नष्ट, 80,000 किसान प्रभावित

Web Summary : जलगाँव जिले में भारी बारिश से आठ तालुकाओं में 57,000 हेक्टेयर में खरीफ की फसलें नष्ट हो गईं। लगभग 80,000 किसान इस भारी फसल क्षति से प्रभावित हुए हैं, जो पिछले चार महीनों में सबसे खराब है।

Web Title : Jalgaon: Heavy Rains Destroy Crops on 57,000 Hectares, Affecting 80,000 Farmers

Web Summary : Heavy rains in Jalgaon district destroyed kharif crops across 57,000 hectares in eight talukas. Approximately 80,000 farmers have been affected by this massive crop damage, the worst in the last four months.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.