Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > अतिवृष्टीने शेतकऱ्याचा ३५ टन कांदा नासला मात्र महसूल कर्मचाऱ्यांना पंचनाम्यासाठी वेळच मिळेना!

अतिवृष्टीने शेतकऱ्याचा ३५ टन कांदा नासला मात्र महसूल कर्मचाऱ्यांना पंचनाम्यासाठी वेळच मिळेना!

Heavy rains destroyed 35 tons of a farmer's onion, but revenue officials didn't have time to do the Panchnama! | अतिवृष्टीने शेतकऱ्याचा ३५ टन कांदा नासला मात्र महसूल कर्मचाऱ्यांना पंचनाम्यासाठी वेळच मिळेना!

अतिवृष्टीने शेतकऱ्याचा ३५ टन कांदा नासला मात्र महसूल कर्मचाऱ्यांना पंचनाम्यासाठी वेळच मिळेना!

शेतात साठवून ठेवलेला ३५ टन शेतकऱ्याचा कांदा अतिवृष्टीत पावसाचे पाणी शेडमध्ये गेल्याने खराब झाल्याचा प्रकार वडवणी तालुक्यातील कोठारबन येथे समोर आला असून एवढे नुकसान होऊनही वडवणी तहसील प्रशासन व कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामा करण्यासाठी तसदी घेतली नाही.

शेतात साठवून ठेवलेला ३५ टन शेतकऱ्याचा कांदा अतिवृष्टीत पावसाचे पाणी शेडमध्ये गेल्याने खराब झाल्याचा प्रकार वडवणी तालुक्यातील कोठारबन येथे समोर आला असून एवढे नुकसान होऊनही वडवणी तहसील प्रशासन व कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामा करण्यासाठी तसदी घेतली नाही.

शेअर :

Join us
Join usNext

धम्मपाल डावरे 

शेतात साठवून ठेवलेला ३५ टन शेतकऱ्याचा कांदा अतिवृष्टीत पावसाचे पाणी शेडमध्ये गेल्याने खराब झाल्याचा प्रकार बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील कोठारबन येथे समोर आला असून एवढे नुकसान होऊनही वडवणी तहसील प्रशासन व कृषी अधिकाऱ्यांनी पंचनामा करण्यासाठी तसदी घेतली नाही.

त्यामुळे कांदा जागेवरच सडून शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे वडवणीच्या तहसीलदारांचा अधिकारी, कर्मचाऱ्यांवर वचक नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. तालुक्यातील कोठारबन येथील शेतकरी तुळशीराम घुले यांच्या शेतामधील शेडमध्ये ३५ टन कांदा साठवून ठेवण्यात आला होता.

अतिवृष्टीत शेडमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने कांदा खराब झाला. त्यांनतर शेतकऱ्याने नुकसानीचा पंचनामा व्हावा म्हणून कृषी व तहसीलच्या कर्मचाऱ्यांकडे चकरा मारल्या; परंतु त्यांनी दुर्लक्ष केले.

गेल्या काही दिवसांपासून वडवणी तहसील प्रशासन आणि कृषी विभागाचे अधिकारी कांद्याचा पंचनामा करण्यास टाळाटाळ करत असल्याची तक्रार शेतकऱ्याने थेट वडवणी तहसीलदारांकडे केली आहे.  त्यामुळे अधिकारी व कर्मचारी मुजोर झाले असून, ते तहसीलदारांनाही जुमानत नसल्याचे दिसून येत आहे.

संबंधित शेतकऱ्याने अतिवृष्टीमुळे साठवून ठेवलेल्या कांद्याचे नुकसान झाल्याचे उशिरा सांगितले आहे. शेतकऱ्यांच्या कांदा पिकाच्या नुकसानीचे पंचनामे लवकरच करण्यात येतील. - आर. के. सोनवणे, तलाठी, कोठारबन जि. बीड.

आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीवर अवलंबून असून शेतात पिकविलेला कांदा अतिवृष्टीमुळे खराब झाला असून खराब झालेल्या कांद्याचे पंचनामे करण्यास प्रशासन टाळाटाळ करत आहे. तहसीलदारांच्या नावे निवेदन दिलेले आहे. पीक नुकसानीचे पंचनामे न केल्यास आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय माझ्याकडे नाही. - तुळशीराम घुले, शेतकरी, कोठारबन.

हेही वाचा : उत्पादनशून्य जनावरांपासून यशस्वी उदरनिर्वाह; बीडच्या उमा ताईंची गोसेवेतील प्रेरणादायी वाटचाल

Web Title : बारिश से किसान की प्याज की फसल बर्बाद; अधिकारियों ने मूल्यांकन में देरी की।

Web Summary : बीड जिले में भारी बारिश से एक किसान की 35 टन प्याज की फसल बर्बाद हो गई। भारी नुकसान के बावजूद, कृषि अधिकारियों ने क्षति का आकलन करने में देरी की, जिससे और अधिक वित्तीय कठिनाई हुई। किसान ने सरकारी उदासीनता के कारण आत्महत्या करने की धमकी दी।

Web Title : Farmer's Onion Crop Rot After Rain; Officials Delay Assessment.

Web Summary : Heavy rains ruined 35 tons of a farmer's onion crop in Beed district. Despite the significant loss, agriculture officials delayed the damage assessment, causing further financial hardship. The farmer threatened suicide due to official apathy.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.