अहिल्यानगर : जिल्ह्यासह राज्यातील धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने साठवण क्षमता कमी झाली. यासाठी तंत्रज्ञानाच्या साह्याने धरणांचे सर्व्हेक्षण करुन गाळ काढण्याचे नियोजन केले जाणार आहे.
शेतकऱ्यांना धरणातील गाळ मोफत दिला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
अहिल्यानगर येथील पालकमंत्री कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, मुळा धरणात ३ टीएमसी गाळ साचला आहे. धरणांतील गाळ काढला तर अनेक प्रश्न कमी होतील. पहिल्या टप्प्यात चार धरणांचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे.
धरणात किती गाळ साचला आहे, हे यातून समजणार आहे. धरणातील काढलेला गाळ शेतकऱ्यांना शेतात टाकण्यासाठी मोफत दिला जाणार आहे. मुळा धरणात ३ टीएमसी गाळ साचला असण्याची शक्यता आहे.
शिवाय जायकवाडी धरणात १५-२० टीएमसी तर उजनी धरणात १०-१५ टीएमसी गाळ साचला असण्याची शक्यता विखे पाटील यांनी व्यक्त केली पहिल्या टप्प्यात चार धरणातील गाळ काढला जाणार आहे.
अधिक वाचा: वडिलोपार्जित शेतजमीन वाटणीचा खर्च आता वाचणार; वाचा महसूल विभागाचा 'हा' नवीन निर्णय?
Web Summary : Maharashtra farmers will receive free silt from dams after surveys to determine silt accumulation. The initiative aims to restore dam capacity. Pilot surveys will focus on four dams initially, with potential for significant silt removal from dams like Jayakwadi and Ujani.
Web Summary : महाराष्ट्र के किसानों को गाद जमाव निर्धारित करने के लिए सर्वेक्षण के बाद बांधों से मुफ्त गाद मिलेगी। इस पहल का उद्देश्य बांध की क्षमता को बहाल करना है। पायलट सर्वेक्षण शुरू में चार बांधों पर ध्यान केंद्रित करेंगे, जिसमें जायकवाड़ी और उजनी जैसे बांधों से गाद हटाने की संभावना है।