Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > रब्बीतील करडई उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ; वाचा काय आहेत कारणे

रब्बीतील करडई उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ; वाचा काय आहेत कारणे

Farmers turned their backs on safflower production in Rabi; Read the reasons | रब्बीतील करडई उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ; वाचा काय आहेत कारणे

रब्बीतील करडई उत्पादनाकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ; वाचा काय आहेत कारणे

तेल बियांमध्ये करडईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वी ग्रामीण भागात जिरायत शेतीत करडई है अंतर्गत पीक घेतले जायचे. चार सरी ज्वारी तर एक सरी करडई अशा प्रकारे हे पीक पेरत असते; परंतु करडई लागवडीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस घट होत आज ते पीक हद्दपारच झाले आहे.

तेल बियांमध्ये करडईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वी ग्रामीण भागात जिरायत शेतीत करडई है अंतर्गत पीक घेतले जायचे. चार सरी ज्वारी तर एक सरी करडई अशा प्रकारे हे पीक पेरत असते; परंतु करडई लागवडीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस घट होत आज ते पीक हद्दपारच झाले आहे.

जालिंदर शिंदे 

तेल बियांमध्ये करडईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पूर्वी कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामीण भागात जिरायत शेतीत करडई है अंतर्गत पीक घेतले जायचे. चार सरी ज्वारी तर एक सरी करडई अशा प्रकारे हे पीक पेरत असते; परंतु करडई लागवडीच्या क्षेत्रात दिवसेंदिवस घट होत आज ते पीक हद्दपारच झाले आहे.

त्यामुळे करडई तेलाशी निगडित असणाऱ्या अनेक लहान उद्योगांना याचा मोठा फटका बसला आहे. सांगली जिल्ह्याच्या कवठे महांकाळ तालुक्यातील अनेक गावात पिठाच्या गिरणी सोबतच तिथे तेल घाणे होते.

केवळ करडईची आवकच नसल्याने हे घाणे बंद पडले आहेत. अनेकजण घरचे तेल म्हणून घरातील करडई घेऊन तेल काढत असत; मात्र आता याठिकाणी केवळ बंद पडलेल्या घाण्यावरील अवजारांचे अवशेष शिल्लक आहेत.

तेल उद्योगासंबंधी साहित्य आता अक्षरशः अडगळीत पडले आहे. एकेकाळी आम्ही हा उद्योग करायचो, हीच काय ती आठवण सांगण्यासाठी या भंगाराची देखभाल करावी लागत आहे. करडईचे उत्पन्न घटल्यामुळे ही अवकळा आली आहे. तेल उद्योग आता परवडणारा न राहिल्याने इतकी वाईट परिस्थिती आहे. - नारायण शिंदे, तेल घाणा व्यावसायिक, घाटनांद्रे.

शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे कल

सध्या शेतमालाला मिळणारा कवडीमोल भाव, निसर्गाची अवकृपा त्यामुळे उत्पादन बेभरवशाचे ठरत आहे. निसर्गाच्या बदलामुळे शेतकऱ्यासमोर अनेक आव्हाने आवासून उभी आहेत.

तसेच दुष्काळी अनेक भागात पाणी आल्यामुळे शेतकरी ऊस, डाळिंब, द्राक्षे व अन्य नगदी पिके मिळवून आर्थिक स्तर उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे. यामुळे पारंपरिक पिके घेण्याकडे शेतकरी फारसा उत्साही दिसत नाही.

रब्बी हंगामात करडईच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल असायचा; मात्र बदलत्या काळात नगदी उत्पन्न देणाऱ्या द्राक्ष, डाळिंब, ऊस लागवडीकडे शेतकरी वळले आहेत. पूर्व ज्वारी पिकात अंतरपीक म्हणून या पिकाचा समावेश असायचा; मात्र शेतकऱ्यांनी ज्वारी लागवडीकडे दुर्लक्ष केल्याने उत्पादन घसरले. - राजकुमार पाटील, उप कृषी अधिकारी, रांजणी विभाग, कवठेमहांकाळ जि. सांगली.

हेही वाचा : केवळ अडीच तासांच्या चार्जिंगमध्ये साडे पाच तास काम करणारा ई-टिलर; तरुण अभियंत्यांचा आधुनिक ऍग्रोडॅश

Web Title : किसानों ने रबी की कुसुम फसल को छोड़ा, नकदी फसलों की ओर रुझान।

Web Summary : सांगली के कवठेमहांकाल में कुसुम की खेती में गिरावट आई है, क्योंकि किसान गन्ने, अंगूर और अनार जैसी आकर्षक नकदी फसलों की ओर बढ़ रहे हैं। कुसुम पर निर्भर तेल मिलें बंद हो रही हैं, जिससे स्थानीय व्यवसाय और परंपराएं प्रभावित हो रही हैं। पानी की उपलब्धता पारंपरिक कुसुम की तुलना में नकदी फसल की खेती को प्रोत्साहित करती है।

Web Title : Farmers abandon Rabi's safflower crop due to better cash crops.

Web Summary : Safflower cultivation declines in Kavthemahankal, Sangli, due to farmers shifting to lucrative cash crops like sugarcane, grapes, and pomegranates. Oil mills dependent on safflower are closing, impacting local businesses and traditions. Water availability encourages cash crop cultivation over traditional safflower.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.