Join us

राज्यात तब्बल ३७ हजार हेक्टरवरील पिकांची झाली माती; आजपासून पंचनाम्यांना सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:19 IST

राज्यात गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सुमारे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबई वगळता राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये या पावसाने धुमाकूळ घातला आहे.

पुणे : राज्यात गेल्या २३ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सुमारे ३८ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. मुंबई वगळता राज्यातील २९ जिल्ह्यांमध्ये या पावसाने धुमाकूळ घातला आहे.

या पावसाचा सर्वाधिक फटका अमरावती जिल्ह्याला बसला असून येथील सुमारे साडेबारा हजार हेक्टरहून अधिक शेतीचे नुकसान झाले असल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, नुकसानीचा अंदाज घेण्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कृषी सहायकांनी काम बंद आंदोलन स्थगित केल्यामुळे आता पंचनाम्यांना आता वेग येईल, असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

राज्यभरात जिल्हानिहाय नुकसान (हेक्टरमध्ये)धुळे - ६४५नंदुरबार - १०५बुलढाणा -  ५,७३७अमरावती - १२,५६५नागपूर - ४२भंडारा - ३८५पालघर - ७९६नाशिक - ३,४५३अकोला - ९०९गोंदिया - १४३ठाणे - १अहिल्यानगर - १,२१५बीड - १०यवतमाळ - २९०गडचिरोली - ३४२वाशिम - २२४ जालना - १,७२६परभणी - ३३८हिंगोली - ६०धाराशिव - १२५नांदेड -  ७लातूर - ४,०८५रायगड - ४२पुणे - ६७६रत्नागिरी - १सातारा - ७३सोलापूर - १,६६६एकूण - ३७,८०६

या पिकांची झाली मातीपावसामुळे फळबागा, भाजीपाला तसेच कांदाबाजरी पिकाला फटका बसला. कृषी विभागानुसार राज्यात चार मे ते २७ मे या काळात ३७ हजार ८०६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत कृषी सहायकांच्या मागण्या मान्य झाल्याने बुधवारपासून पंचनामे करण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा: शेतजमिन वाटणीपत्राच्या दस्त नोंदणीस लागणारी फी माफ; काय आहे निर्णय? वाचा सविस्तर

टॅग्स :पीकपाऊसमहाराष्ट्रशेतीशेतकरीराज्य सरकारसरकारकांदाबाजरी