Lokmat Agro >शेतशिवार > शेतकरी अपघात विमा योजनेत बदल; आता अपघातग्रस्त कुटुंबाला मिळणार तत्काळ मदत

शेतकरी अपघात विमा योजनेत बदल; आता अपघातग्रस्त कुटुंबाला मिळणार तत्काळ मदत

Changes in Farmers' Accident Insurance Scheme; Now accident-affected families will get immediate assistance | शेतकरी अपघात विमा योजनेत बदल; आता अपघातग्रस्त कुटुंबाला मिळणार तत्काळ मदत

शेतकरी अपघात विमा योजनेत बदल; आता अपघातग्रस्त कुटुंबाला मिळणार तत्काळ मदत

shetkari apghat vima yojana ज्यात शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा रस्ते अपघातासह अन्य कोणत्याही कारणामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

shetkari apghat vima yojana ज्यात शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा रस्ते अपघातासह अन्य कोणत्याही कारणामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

शेअर :

Join us
Join usNext

राज्यात शेती व्यवसाय करताना वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे आदी नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा रस्ते अपघातासह अन्य कोणत्याही कारणामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.

अथवा अपंगत्व आल्यास कुटुंबाचे उत्पन्नाचे साधन बंद होते. यासाठी शेतकऱ्यांना, त्यांच्या कुटुंबीयांसाठी अपघात विमा योजना सुरू केली. या अंतर्गत २ लाखांची मदत मिळते.

किती मिळते मदत?
योजनेंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास २ लाख तर दोन डोळे, दोन अवयव निकामी झाल्यास २ लाख तर एक डोळा अथवा एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपये मदत करण्यात येते.

२००५-०६ पासून योजना कार्यान्वित
-
शेतकरी व्यक्तिगत अपघात विमा योजना २००५-०६ पासून कार्यान्वित केलेली होती. २००९-१० पासून या योजनेचे नामाभिधान शेतकरी जनता अपघात विमा योजना असे करण्यात आले.
- योजनेचे पुन्हा नामाभिधान गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना असे करण्यात आले. अपघातग्रस्त व्यक्तीची वयोमर्यादा १० ते ७५ वर्षे आहे.

विमा संरक्षणातील समाविष्ट बाबी
अपघात, बुडून मृत्यू, वीज पडून, जंतूनाशक हाताळताना, अन्य कारणांमुळे विषबाधा, शाॅक, खून, उंचावरून पडून मृत्यू, सर्पदंश, हत्या, जनावराने चावल्याने मृत्यू किंवा अपंगत्व, दंगल, बाळंतपणातील मृत्यू, अन्य अपघात ग्राह्य धरले जाणार आहे.

३० दिवसांत प्रस्ताव सादर
अपघात घडल्यानंतर ३० दिवसांच्या आत परिपूर्ण प्रस्ताव संबंधित तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे सादर करायचा आहे.
तपासणी करून त्वरित मदत देण्याची कार्यवाही तालुकास्तरीय समितीने करावयाची आहे.
अपघातात आता बाळंतपणातील मृत्यूचा देखील समावेश करण्यात आला आहे.

नवीन योजनेच्या ठळक वैशिष्ट्यांमुळे मिळणार लवकर मदत
- पूर्वी शासन राज्यातील सर्व शेतकऱ्यांचा विमा हप्ता विमा कंपनीकडे भरायची आणि विमा कंपनी मग प्रस्ताव तपासून मान्य करायची, मात्र यात कधी कधी १ ते २ वर्षांचा विलंब व्हायचा.
- जुजबी त्रुटी काढून प्रस्ताव परत करणे, अनावश्यक त्रुटी काढून प्रस्ताव नाकारणे अशा बाबी व्हायच्या.
- यामुळे अपघातग्रस्त शेतकरी कुटुंबाला तत्काळ दिलासा देण्याचा हेतू साध्य करताना अडचणी यायच्या.
- म्हणून आता अपघातग्रस्त कुटुंबाला तत्काळ मदतीसाठी प्रस्ताव मंजुरीचे अधिकार तालुकास्तरावर तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समितीला दिले आहेत.

अधिक वाचा: आता शेतजमिनीचे वाद मिटणार, महसूल विभाग सुरु करतोय हा नवीन उपक्रम; वाचा सविस्तर

Web Title: Changes in Farmers' Accident Insurance Scheme; Now accident-affected families will get immediate assistance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.