lokmat Supervote 2024
Lokmat Agro >ॲग्री बिझनेस >डेअरी > धान्य व चारा उत्पादनासाठी उन्हाळी बाजरीची लागवड कशी कराल?

धान्य व चारा उत्पादनासाठी उन्हाळी बाजरीची लागवड कशी कराल?

How to plant summer pearl millet bajara for grain and fodder production? | धान्य व चारा उत्पादनासाठी उन्हाळी बाजरीची लागवड कशी कराल?

धान्य व चारा उत्पादनासाठी उन्हाळी बाजरीची लागवड कशी कराल?

बाजरी हे पीक कमी कालावधीत तयार होते आणि ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या देऊन घेता येते. उन्हाळ्यात पिकास भरपूर सूर्यप्रकाश, वेळेवर आणि गरजेनुसार पाणी सिंचन कीड-रोगाचा प्रादुर्भाव होत नसल्यामुळे धान्य आणि चारा उत्पादन जास्त मिळते. उन्हाळ्यात दुभत्या तसेच इतर जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न सोडविला जातो.

बाजरी हे पीक कमी कालावधीत तयार होते आणि ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या देऊन घेता येते. उन्हाळ्यात पिकास भरपूर सूर्यप्रकाश, वेळेवर आणि गरजेनुसार पाणी सिंचन कीड-रोगाचा प्रादुर्भाव होत नसल्यामुळे धान्य आणि चारा उत्पादन जास्त मिळते. उन्हाळ्यात दुभत्या तसेच इतर जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न सोडविला जातो.

शेअर :

Join us
Join usNext

बाजरी हे पीक कमी कालावधीत तयार होते आणि ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या देऊन घेता येते. उन्हाळ्यात पिकास भरपूर सूर्यप्रकाश, वेळेवर आणि गरजेनुसार पाणी सिंचन कीड-रोगाचा प्रादुर्भाव होत नसल्यामुळे धान्य आणि चारा उत्पादन जास्त मिळते. उन्हाळ्यात दुभत्या तसेच इतर जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न सोडविला जातो.

आहाराच्या दृष्टीने बाजरी एक अत्यंत महत्त्वाचे तृणधान्य आहे. लहान मुले व गर्भवती महिलांसाठी या धान्याचे अनन्य साधारण महत्त्व आहे. बाजरी धान्याचा उपयोग भाकरी, खिचडी, घाटा नूडल्स, आंबील लाह्या व इडली या विविध स्वरूपात करता येतो. शिवाय ५० टक्के, गव्हाचे पीठ मिसळून बिस्कीटस् बनवता येतात. त्याचप्रमाणे बाजरी धान्यापासून मद्यनिर्मिती होऊ शकते. पशुधन व कुक्कुटपालनातील पशुखाद्य निर्मितीसाठी वापरता येते. बाजरीच्या चाऱ्यात विषारी पदार्थ नसल्यामुळे हिरवा चारा दुभत्या जनावरांसाठी उपयुक्त ठरतो. बाजरी पिकाच्या चाऱ्यात ८.७ टक्के प्रथिनांचे प्रमाण असते.

बाजरीचे धान्य वाळल्यानंतर लायपेज नावाच्या घटकामुळे पीठ कडू होते व दीर्घकाळ वापरण्याच्या अवस्थेत राहू शकत नाही. त्यामुळे व्यापारी तत्त्वावर ग्राहकांना पीठपुरवठा करण्यास अडचणी येतात. त्यासाठी धान्य दळण्यापूर्वी ८० अंश सें.ग्रे. तापमानाला ८० सेकंद कालावधीसाठी उकळत्या पाण्यातून काढून वाळविल्यानंतर दळल्यास पीठ वापरण्याचा कालावधी वाढविता येतो. या तंत्रज्ञानामुळे बाजरी पिठाचा पुरवठा ग्राहकांना करणे सोपे होईल.

पूर्वमशागत
जमिनीची लोखंडी नांगराने १५ सें.मी. खोल नांगरट करावी व उन्हाळ्यात तापू द्यावी. जमीन तापल्यानंतर, कुळवाच्या दोन पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. पूर्वी घेतलेल्या पिकाचे धसकटे, काडी-कचरा, हरळी, कुंदा वेचून शेत स्वच्छ करावे. शेवटच्या कुळवणी अगोदर हेक्टरी ५ टन शेणखत किंवा २.५ टन गांडूळ खत शेतात पसरवून टाकावे म्हणजे कुळवणी बरोबर ते जमिनीत समप्रमाणात मिसळले जाते.

पेरणीची वेळ
बाजरीची पेरणी १५ जानेवारी ते १५ फेब्रुवारी यादरम्यान केल्यास उत्पादन अधिक मिळते. जानेवारी महिन्यात तापमान १० सें.ग्रे. पेक्षा खाली गेलेले असल्यामुळे त्याचा उगवणीवर अनिष्ट परिणाम होतो अशा परिस्थितीत पेरणी थंडी कमी झाल्यावर करावी. मात्र उन्हाळी बाजरी लागवड १५ फेब्रुवारीनंतर करू नये, कारण पीक पुढील उष्ण हवामानात सापडण्याची भिती असल्याने कणसात दाणे भरण्याचे प्रमाण कमी होते. त्यामुळे उत्पादनात घट येते. तसेच खासगी कंपन्यांचे ८६ एम ६४, ८६ एम ८६, एनबीएच - ५७६७ प्रताप व कावेरी सुपर बॉस या संकरित वाणांची लागवड करावी. कारण हे वाणसुद्धा जास्त उत्पादन (धान्य आणि चारा) देणारे असून केवडा रोगास प्रतिकारक्षम आहेत.

बियाणे आणि बीजप्रक्रिया
पेरणीसाठी हेक्टरी ३ ते ४ किलो चांगले निरोगी बियाणे वापरावे. अरगट आणि गोसावी रोगाच्या नियंत्रणासाठी बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे वापरावे.
अ) २० टक्के मिठाच्या द्रावणाची बीजप्रक्रिया (अरगट रोगासाठी) बीजप्रक्रिया केलेले प्रमाणित बियाणे उपलब्ध नसल्यास पेरणीपूर्वी बियाण्यास २० टक्के मिठाच्या द्रावणाची प्रक्रिया करावी. त्यासाठी १० लीटर पाण्यात २ किलो मीठ विरघळावे. पाण्यावर तरंगणारे बुरशीयुक्त हलके बियाणे बाजूला काढून त्याचा नाश करावा व तळाला असलेले निरोगी आणि वजनाने जड असलेले बियाणे वेगळे करून पाण्याने २ ते ३ वेळा धुवावे त्यानंतर सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.
ब) मेटॅलॅक्झील ३५ एसडी (ॲप्रॉन) बीजप्रक्रिया (गोसावी रोगासाठी) : पेरणीपूर्वी बियाण्यास ६ ग्रॅम मेटॅलॅक्झील ३५ एसडी (ॲप्रॉन) प्रति किलो बियाण्यास चोळून नंतर पेरणी करावी.
क) अझोस्पिरिलम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया : २५ ग्रॅम अझोस्पिरिलम प्रति किलो बियाण्यास चोळून पेरणी करावी. त्यामुळे २० ते २५ टक्के नत्र खताची बचत होऊन उत्पादनात १० टक्के वाढ होते. तसेच स्फुरद विरघळविणारे जिवाणूची २५ ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी.

सुधारित व संकरित जाती
उन्हाळी हंगामासाठी बाजरीच्या सुधारित व संकरित वाणांची जमिनीच्या मगदुराप्रमाणे पेरणी करावी. त्यासाठी जी.एच.बी. ५५८ तसेच खासगी कंपन्यांचे प्रोॲग्रो ९४४४, ८६ एफ १३, ८६ एफ ६४, ८६ एम ६६, एन.एम.एच. ७३, एन.एच.एम. ७५ या संकरित वाणांची लागवड करावी. तर सुधारित वाणामध्ये धनशक्ती (आय.सी.टी.पी. ८२०३ लोह १०.२) व आय.सी.एम.व्ही. २२१ या वाणाची लागवड करावी.

पेरणीची पद्धत
पेरणीपूर्वी शेत ओलवून वापसा आल्यावर करावी. जमिनीच्या उतारानुसार ५ ते ७ मीटर लांबीचे व ३ ते ४ मीटर रुंदीचे सपाट वाफे तयार करावेत. पेरणी दोन चाड्याच्या पाभरीने करावी व दोन ओळीत ४५ सें.मी. आणि दोन रोपांमध्ये १५ सें.मी. अंतर ठेवावे. (हेक्टरी सुमारे १.५० लाख रोपे) पेरणी ३ ते ४ सें.मी. पेक्षा जास्त खोलीवर करू नये.

रासायनिक खताचा वापर
माती परीक्षणानुसारच रासायनिक खत द्यावीत. मध्यम जमिनीसाठी हेक्टरी ५० किलो नत्र, २५ किलो स्फुरद आणि २५ किलो पालाश व हलक्या जमिनीत ४० किलो नत्र, २० किलो स्फुरद आणि २० किलो पालाश खतांचा अवलंब करावा. पेरणीचे वेळी अर्धे नत्र व संपूर्ण स्फुरद आणि पालाश द्यावे. त्यानंतर २५ ते ३० दिवसांनी अर्धे नत्र द्यावे. तसेच ज्या जमिनीत झिंकची कमतरता असेल त्या जमिनीत हेक्टरी २० किलो झिंक सल्फेट पेरणी करताना द्यावे.

विरळणी
हेक्टरी रोपाची संख्या योग्य व मर्यादित राहण्याकरिता पेरणीनंतर २० दिवसांनी विरळणी करावी. दोन रोपातील अंतर १० सें.मी. ठेवावे. उगवण विरळ झाल्यास उगवणीनंतर ७ ते ८ दिवसांनी नांगे भरून घ्यावे.

आंतरमशागत/तण नियंत्रण
तणांचा बंदोबस्त करण्यासाठी २ वेळा कोळपण्या आणि गरजेनुसार एक ते दोन वेळा खुरपणी करावी. पेरणी केल्यापासून सुरुवातीचे ३० दिवस शेत तणविरहित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. कारण याच कालावधीत तण व पीक यांच्यात हवा, पाणी, अन्नद्रव्ये आणि सूर्यप्रकाश मिळविण्यासाठी स्पर्धा होत असते किंवा एकात्मिक तणनियंत्रण पद्धतीमध्ये अँट्राझीन तणनाशकाची १.० किलो प्रति हेक्टरी पेरणीनंतर परंतु पीक उगवण्यापूर्वी ५०० लीटर पाण्यात मिसळून जमिनीवर फवारणी करावी व एक खुरपणी पेरणीनंतर २५ ते ३० दिवसांच्या आत करावी.

पाणी व्यवस्थापन
उन्हाळी बाजरी पिकास ३५ ते ४० सें.मी. पाण्याची गरज असते. पेरणीनंतर ४ दिवसांनी हलके पाणी द्यावे. त्यानंतर मगदुरानुसार १० ते १२ दिवसांच्या अंतराने ५ ते ६ पाण्याच्या पाळ्या द्याव्या. पाण्याची उपलब्धता असल्यास खालील संवेदनक्षम अवस्थेत पाणी दिल्यास अधिक उत्पादन मिळू शकते. पहिले पाणी फुटवे येण्याच्या वेळी (पेरणीनंतर २० ते २५ दिवसांनी) दुसरे पाणी पीक पोटरीत असताना (पेरणीनंतर ६० ते ६५ दिवसांनी) द्यावे.

डॉ. खुशाल बऱ्हाटे, रवींद्र सूर्यवंशी व श्री. मोहनदास गावित
बाजरी संशोधन योजना, कृषी महाविद्यालय, धुळे

Web Title: How to plant summer pearl millet bajara for grain and fodder production?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.