पावसाळा जरी फार सुंदर असला तरी काही गोष्टी फार सतावतात. सगळीकडे चिखल असतो. भरपूर पाणी भरते त्यामुळे कपडे ओले होतात. आणि आणखी एक गोष्ट म्हणजे पावसाळ्यात सगळीकडे शेवाळ वाढते. (Is moss accumulating in the yard, making it slippery? Try this simple solution, don't wait until someone slips and falls.)शेवाळीवरुन पाय घसरुन पडायला होते. पाठीला पोटाला जोरदार मार लागतो. कितीही चांगल्या चपला घातल्यातरी पाय घसरतोच. धावपळ करणारी लहान मुले पावसाळ्यात शेवाळीवरुन घसरुन सटासट पडतात. शेवाळ काढण्याचा अगदी साधा मार्ग आहे. जो वर्षानुवर्षे चालत आला आहे. काही सोप्या स्टेप्स फॉलो करुन शेवाळ काढता येते. त्यासाठी लागणारे साहित्यही घरात उपलब्ध असते. सगळ्यात आधी शेवाळावरून खराट्याचा झाडू फिरवायचा. त्याने वरील कोवळा थर निघून जाईल. थोड्या वेळासाठी तसेच सोडून द्यायचे. खराट्याने निघालेली घाण बाजूला करायची. नाही तर पुन्हा चिकटते.
जिकडे जिकडे शेवाळ धरते त्या सगळ्या ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकायची. भरपूर ओतायची. जमिन सफेद दिसायला हवी. ती पावडर किमान ४ ते ५ तासांसाठी तशीच ठेवायची. पावसाची चिन्ह नसतील त्या दिवशी रात्रभर पावडर पसरवायची. दुसऱ्या दिवशी सकाळी शेवाळ जागा सोडते. मग पुन्हा खराटा घ्यायचा आणि सापासप जोर लावून जमिनीवर घासायचा. शेवाळ नक्कीच निघते. अगदी उन्हाळ्यात जशी जमिन असते तशी होणार नाही. मात्र पाय घसरुन कोणी पडणार नाही यासाठी नक्कीच फायद्याचे ठरेल. नंतर पुन्हा काही दिवसांना अगदी अशीच प्रक्रिया करायची. पुन्हा पावडर घालायची आणि जमिन स्वच्छ धुवायची. मधल्या काळात जमिनीवर बेकींग सोडाही घालून साफ करु शकता.
पाऊस म्हल्यावर शेवाळं तयार होणारच. शेवाळं पाणी साजून राहिल्यामुळे तयार होते. त्यात भरपूर ओलावा असतो. लहान गवतामध्ये पाणी साठून राहते आणि ते निसरडे होते. मग त्याला आपण शेवाळं असं म्हणतो. मात्र पावसाळा सुरु होण्याआधीच पाणी साठणार नाही यासाठी सोय करता आली तर शेवाळं जास्त धरणार नाही. त्यामुळे पावसाळ्या आधीच काळजी घ्यायला सुरवात करायची. शेवाळं धरेपर्यंत थांबू नका. त्यावरुन पाय घसरुन पडल्यावर जोरदार मार लागू शकतो.