बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांनी क्रिकेटवर आधारीत एक चित्रपट प्रदर्शित झाला आहे. १९८३ मध्ये भारताने मिळवलेल्या यशावर आधारीत हा चित्रपट म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी एक सुखद आठवणच म्हणावी लागेल. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात रंगलेली वर्ल्ड कपचा अंतिम सामन्यावर आधारीत ८३ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. वेस्ट इंडिजचे प्रसिद्ध क्रिकेटर विवियन रिचर्डस हेही या सामन्यातील खेळाडूंपैकी एक होते. त्यांची मुलगी म्हणजे भारतीय प्रसिद्ध अभिनेत्री मसाबा गुप्ता. आपण हा महत्त्वपूर्ण सामना पाहू शकलो नाही याची खंत मसाबाने नुकतीच व्यक्त केली. मसाबाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये ८
रणवीर सिंग याने कपिल देव यांची भूमिका केली असून रोमीची भूमिका दिपिका पदुकोण हिने साकारली आहे. हा काळ डोळ्यासमोर जसाच्या तसा उभा करण्यात दिग्दर्शक कबीर खान बऱ्याच प्रमाणात यशस्वी झाला आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. भारतीय संघाने त्या काळात वर्ल्ड कप जिंकण्यासाठी घेतलेले कष्ट, प्रतिकूल परिस्थिती, खेळांडूंमध्ये असणारी जिद्द आणि अखेर वर्ल्ड कप जिंकल्यानंतर देशात त्याना मिळणारा मान हा सगळा पट या सिनेमातून नेमकेपणाने उलग़डण्यात आला आहे. त्यामुळेच प्रेक्षक सिनेमागृहात चित्रपट पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत असल्याचे चित्र आहे.