पावसाळ्याच्या दिवसांमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दिसतात. ठराविक ऋतूमध्ये हे प्राणी काहीमहिन्यांसाठी दिसतात नंतर परत वर्षभर दिसतच नाहीत. जसे की बेडूक. (A simple solution use pot of water, during the monsoon, insects and bugs that come into the house will disappear, a simple solution, home remedies )पावसाळ्यात जागोजागी डरावडराव असा आवाज ऐकू येतो. फक्त प्राणीच नाही तर काही पक्षी आणि काही कीटकही फक्त पावसाळ्यात बाहेर पडतात. यांना पावसाळी कीडे असे म्हटले जाते. वेगळे खास काही नाव नाही. हे कीडे प्रकाशाच्या दिशेने आकर्षित होतात. अगदी मिणमिणता दिवा जरी दिसला की घोळक्याने जमा होतात. संख्या वाढतच जाते. दोन, चार, दहा मग अख्खे गावच जमा होते. अनेकांना असे वाटते की पावसाळी कीडे चावत नाहीत. मात्र तसे नसून ते जोरदार चाऊ शकतात. त्यांच्यामुळे रोगराई पसरते. ते कायम घाणीजवळच बसतात.
पावसाळ्यात संध्याकाळ झाली की लगेच टिव्हीजवळ, दिव्याजवळ अगदी मोबाइलवरही भरपूर किडे बसतात. पावसाळ्यात उब मिळवण्यासाठी हे कीडे उजेडाजवळ बसतात. पावसाळ्यात आर्द्रता वाढते. त्यामुळे मग या कीड्यांची संख्याही वाढते. पावसाळा हा या किटकांचा प्रजनन काळ असतो. त्यामुळे ते जास्त सक्रिय असतात. रस्त्यावरील दिव्याजवळ हे कीडे भरपूर प्रमाणात असतात. घरात आले की घरभर पसरतात. जाता जात नाहीत. हे कीडे कानात शिरतात. तोंडात जातात. तसेच कपड्यांमध्ये जाऊन हुळहूळतात. त्यामुळे पावसाळी कीडे दिसले तरी नको वाटते.
पूर्ण वेळ दिवा बंद तर ठेऊ शकत नाही. रात्रीच्या वेळी उजेडासाठी लाईटची फारच गरज असते. पण काहीही उजेड दिसला की हे कीडे घरात शिरतात. त्यांना घालवण्यासाठी अगदी सोपा उपाय आहे. पाहा काय करायचे.
एका खोलगट पातेल्यात पाणी भरायचे. साधे पाणी घ्यायचे. त्यात काही घालायची गरज नाही. एक दिवा लावायचा त्याखाली पाण्याने भरलेलं पातेलं ठेवायचं. हळूहळू सगळे गायब होतात. मग थोडावेळ दिवा बंद करायचा आणि मग घरभर उजेड केला तरी ते कीडे परत येत नाहीत. पाण्याचे भांडे तसेच ठेवायचे.