दिवाळी पाडवा म्हणजे पतीपत्नीच्या नात्याचा रोमॅण्टिक सण. संसार करता करता वर्षभर होणाऱ्या कुरबुरी असो की कटकटी, पाडव्याला एकमेकांना पुन्हा सांगणं की एक वर्ष सोबतीनं सरलं आणि पुढच्या नव्या वर्षाची सुरुवात! नात्यातला हा रोमान्स टिकतो कसा? की रोजच्या संसारी कटकटीत आयुष्य रटाळ होऊन जातं? गृहित धरलं जातं एकमेकांना? लहानसहान गोष्टीतली काळजी करणंच विसरुन जातो आपण?तुम्हाला आठवत असेल मागे एकदा विराट कोहली आणि अनुष्का शर्माचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मॅच सुरु असताना कोहली अनुष्काला काहीतरी विचारत होता.
जेवलीस का खाणाखुणांचं आणि नवरा मोठ्या काळजीनं विचारतोय म्हणून खुश झालेल्या अनुष्काचं मोठ्ंठ हसू व्हायरल झालं तेव्हा अनेकांना ते क्यूट, रोमॅण्टिक वाटलंच. कारण घरोघर बायकांचा अनुभव असा नसतो. अनेकदा नवऱ्यांच्या हातातल्या हातात सगळं आयतं द्यावं लागतं. साधारणं या पुरुषी वृत्तीला ‘तौलिया लाव टाईप्स’ म्हणतात. म्हणजे आंघोळीच्या टॉवेलपासून पाण्याच्या ग्लासपर्यंत सगळं ‘दे’ म्हणत बायकोला ऑर्डर सोडणारे.
म्हणून तर कोहलीचं कामाचं टोकाचं प्रेशर पुढ्यात उभं असून बायकोला जेवलीस का विचारणं हे ‘बातमी’ होतं.तारे जमींपर नावाच्या आमीर खानच्या सिनेमातला एक फार गाजलेला डायलॉग आहे, खयाल रखना और खयाल करना यात फरक आहे, अंतर आहे.
ते अंतर नवरा बायकोच्या नात्यातून निदान या दिवाळी पाडव्याला तरी कमी व्हावं!
Web Summary : Virat Kohli's simple question to Anushka Sharma highlights the importance of care in marriage. The article contrasts this with husbands who take wives for granted, emphasizing the need for attentiveness and consideration in relationships, especially during Diwali Padwa.
Web Summary : विराट कोहली का अनुष्का शर्मा से साधारण सवाल शादी में देखभाल के महत्व को दर्शाता है। लेख उन पतियों के साथ विरोधाभास करता है जो पत्नियों को हल्के में लेते हैं, रिश्तों में ध्यान और विचार की आवश्यकता पर बल देते हैं, खासकर दिवाली पाड़वा के दौरान।