जेवण झाल्यानंतर करा फक्त २ गोष्टी, वजन वाढणार नाही-पोटही सुटणार नाही, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात...

Published:May 20, 2024 03:46 PM2024-05-20T15:46:45+5:302024-05-20T16:31:36+5:30

जेवण झाल्यानंतर करा फक्त २ गोष्टी, वजन वाढणार नाही-पोटही सुटणार नाही, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात...

वाढतं वजन किंवा सुटलेलं पोट यामुळे अनेकजण सध्या त्रस्त आहेत. म्हणूनच तुमचा हा त्रास कमी करण्यासाठी दुपारचं आणि रात्रीचं जेवण झाल्यानंतर २ गोष्टी करायला अजिबात विसरू नका...

जेवण झाल्यानंतर करा फक्त २ गोष्टी, वजन वाढणार नाही-पोटही सुटणार नाही, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात...

ही दोन कामं नेमकी कोणती आणि ती कशा पद्धतीने करावी, याविषयीचा व्हिडिओ आयुर्वेदिक डॉक्टरांनी chitchatrajlavi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर केला आहे.

जेवण झाल्यानंतर करा फक्त २ गोष्टी, वजन वाढणार नाही-पोटही सुटणार नाही, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात...

यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की जेवल्यानंतर तुम्ही १० ते १२ मिनिटांसाठी एका जागी शांत बसा. यामुळे तुमचं अन्न पचन क्रियेपुर्वी पोटात स्थिर होण्यासाठी मदत होईल.

जेवण झाल्यानंतर करा फक्त २ गोष्टी, वजन वाढणार नाही-पोटही सुटणार नाही, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात...

यानंतर मग तुम्ही शतपावली करा. शतपावली करणे म्हणजे १०० पावलं चालणे. शतपावली कशी करावी, जोरात चालावं की हळू चालावं, असे प्रश्न अनेकांच्या मनात येतात. त्यांचीही उत्तरं डॉक्टरांनी व्हिडिओमध्ये दिली आहेत.

जेवण झाल्यानंतर करा फक्त २ गोष्टी, वजन वाढणार नाही-पोटही सुटणार नाही, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात...

डॉक्टर सांगतात की शतपावली करताना अजिबात घाई- गडबड करू नका. उलट अतिशय आरामात, सावकाशपणे, रमतगमत, गप्पा मारत शतपावली करा.

जेवण झाल्यानंतर करा फक्त २ गोष्टी, वजन वाढणार नाही-पोटही सुटणार नाही, आयुर्वेदतज्ज्ञ सांगतात...

अशा पद्धतीने शतपावली केल्यास अन्नाचे व्यवस्थित पचन होते. त्यामुळे साहजिकच अंगावर चरबी साचण्याचे प्रमाण कमी होऊन वजन आटोक्यात राहते आणि वाढत्या पोटावरही नियंत्रण येते.