Join us   

महाशिवरात्र स्पेशल: उपवासामुळे डिहायड्रेशन होऊ नये म्हणून ५ टिप्स, ॲसिडीटी- अपचनही टळेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 08, 2024 1:02 PM

1 / 7
महाशिवरात्रीला अनेक जण हौशीने उपवास करतात. त्यानिमित्ताने अनेक वेगवेगळे पदार्थही खातात. पण उपवासाचे तेलकट- तुपकट जड पदार्थ खाल्ल्याने मग अनेकांना डिहायड्रेशनचा त्रास होतो.
2 / 7
ॲसिडिटी, अपचन असा त्रासही अनेकजणांना होतो. हा त्रास टाळण्यासाठी उपवास करताना थोडी काळजी घ्या. यामुळे उपवासाचा कोणताही त्रास होणार नाही.
3 / 7
उपवासाच्या दिवशी चकल्या, चिप्स असे तेलकट- तुपकट पदार्थ खूप खाल्ले जातात. त्यामुळे दिवसभर भरपूर पाणी प्या. यामुळे पचन व्यवस्थित होईल.
4 / 7
दिवसातून एकदा तरी ताज्या दह्याचं ताक प्या. हे ताक खूप आंबट नको. यामुळे डिहायड्रेशन होणार नाही.
5 / 7
लिंबू सरबतही दुपारच्या वेळी किंवा संध्याकाळच्या वेळी प्या. यामुळे एनर्जी टिकून राहण्यास मदत होईल.
6 / 7
सध्या बाजारात टरबूज, संत्री, मोसंबी अशी फळं मिळत आहेत. ही पाणीदार फळं उपवासाच्या दिवशी आवर्जून खावीत.
7 / 7
काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं. त्यामुळे उपवासाला नुसती काकडी किंवा काकडी आणि दही यांचं सलाड किंवा कोशिंबीर खा. उपवास आरामदायी होईल.
टॅग्स : महाशिवरात्रीहेल्थ टिप्सआहार योजना