1 / 7कौटुंबिक हिंसाचाराच्या कित्येक घटना आपण ऐकतो, वाचतो.. वैष्णवी हगवणे प्रकरण तर सध्या अगदी ताजं आहे. पण वैष्णवीप्रमाणे अगदी मोजकीच प्रकरणे बाहेर येतात. बाकी कित्येक प्रकरणात महिला मुकाटपणे सगळं काही सहन करतात.2 / 7आपल्या आसपास अशा कित्येक महिला असतील ज्यांना नवरा आणि सासरच्या व्यक्तींकडून होणारा छळ सोसावा लागत असेल याचा आपण अंदाजही लावू शकत नाही. अगदी सेलिब्रिटी महिलाही याला अपवाद नाहीत. अशा अनेक अभिनेत्री आहेेत ज्यांना नवरा आणि सासरच्या लोकांकडून खूप त्रास झाला.3 / 7२०१४ मधे अभिनेत्री रती अग्नीहोत्री हिने तिच्या नवऱ्याविरुद्ध म्हणजेच अनिल विरवानी याच्याविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा नोंदविला हाेता. तिचा तिच्या नवऱ्याकडून मानसिक आणि शारिरीक छळ होत होता.4 / 7माजी मिस वर्ल्ड युक्ता मुखी हिलाही लग्नानंतर खूप मानसिक आणि शारिरीक त्रास झाला. तिचा नवरा तिला सातत्याने मारहाण करायचा असं तिने २०१३ साली केलेल्या पोलीस तक्रारीत म्हटलं होतं.5 / 7डिंपी आणि राहूल महाजन यांचं रिॲलिटी शो च्या माध्यमातून लग्न झालं. पण लग्नानंतर काही दिवसांतच डिंपीला राहूलकडून खूप त्रास झाला. 6 / 7राजा चौधरी याच्याशी लग्न केल्यानंतर श्वेता तिवारीलाही नेहमीच त्याच्याकडून होणारा मानसिक आणि शारिरीक त्रास सोसावा लागला. शेवटी तिने त्याच्याविरुद्ध तक्रार दिली. नंतर त्यांचा घटस्फोटही झाला. 7 / 7झीनत अमान यांना त्यांचा पहिला नवरा संजय खान मारहाण करायचा. त्या मारहाणीचे व्रण अजूनही त्यांच्या एका डोळ्याजवळ दिसतात.त्यानंतर त्यांना दुसरा नवरा मजहर खान याच्याकडूनही खूप जाच झाला.