Join us

पावसाळ्यात साखर-मीठाला पाणी सुटतं? धान्य खराब होतं, पाहा ४ सोपे उपाय-यंदा दरवर्षीचा त्रास विसरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2025 17:31 IST

1 / 7
पावसाळा सुरु होण्यापूर्वीच वातावरण काही प्रमाणात दमट होते. वातावरणातील आर्द्रतेमुळे स्वयंपाकघरात ठेवलेल्या काही पदार्थांना ओलावा सुटू लागतो.
2 / 7
पावसाळ्यात साखर- मीठ सारख्या पदार्थांना ओलावा सुटतो. डबा किती पॅकबंद केला तरी मुंग्या लागतात. अशावेळी नेमके काय करावे सुचत नाही.
3 / 7
पावसामुळे घरात ओलावा निर्माण होतो. त्यामुळे जमिनीतून किंवा भिंती ओल्या होतात. अशावेळी पदार्थ सादळतात. आपल्यासोबतही असेच काहीसे होत असेल तर ४ सोपे उपाय लगेच करा.
4 / 7
पावसाळ्यात साखरेला ओलाव्यापासून वाचवण्यासाठी ६ ते ७ लवंग साखरेच्या डब्यात कापडात बांधून ठेवा. असे केल्याने साखर खराब होणार नाही.
5 / 7
पावसाळा सुरु होण्यापूर्वी काचेच्या भांड्यात साखर साठवायला सुरुवात करा. तसेच साखर वापरताना हात आणि चमचा नेहमी कोरडा असायला हवा.
6 / 7
कोणत्याही भांड्यात साखर किंवा मीठ भरण्यापूर्वी त्यात कापडात बांधलेले तांदळाचे दाणे घाला. असे केल्याने पदार्थांमध्ये तयार होणार अतिरिक्त ओलावा शोषून घेण्यास मदत होईल.
7 / 7
ज्या भांड्यात साखर - मीठ ठेवणार असाल तर त्यामध्ये दालचिनीचे काही तुकडे घाला. असे केल्याने साखर आणि मीठ सादळणार नाही. तसेच पदार्थांची चव देखील टिकून राहिल.
टॅग्स : सोशल व्हायरलपाऊस