1 / 8आजकाल रस्त्यातून चालताना सगळ्यांच्या कानात इअरफोन्स लावलेले असतात. सगळे गाणी ऐकत फिरताना दिसतात. खास म्हणजे तरुण पिढीतील मुलं-मुली. गाणी ऐकताना मन प्रसन्न वाटते. तसेच गाण्यांमुळे भावनाही उफाळून येतात. 2 / 8गाण्याचे शब्द , गाण्याचा ताल-सुर आपल्या विचारांवर आपल्या मूडवर परिणाम करतो. त्यामुळे म्यूझिक थेरीपी हा प्रकार एखाद्या व्यक्तीला ट्रिटमेंट देताना वापरला जातो. गाणी ऐकणे आरोग्यासाठी फार फायद्याचे ठरु शकते. खास म्हणजे मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. 3 / 8मराठी गाणी कायमच अर्थ पूर्ण आणि सुंदर असतात. दिग्गजांनी लिहीलेली आणि गुणवंतांनी ताला-सुरात बसवलेली काही गाणी मनाला शांत करतात. मानसिक आरोग्यासाठी अगदी चांगली ठरतात. ही काही गाणी तुमच्याही प्ले-लिस्टमध्ये असायलाच हवीत. 4 / 8हीच अमुची पार्थना अन् हेच आमुचे मागणे, माणसाने माणसाची माणसा सम वागणे || मनाला जगात असलेल्या सकारात्मकतेची जाणीव करुन द्यायला या दोन ओळीच पुरेशा आहेत. संपूर्ण गाणे ऐकेपर्यंत आपल्याला आयुष्यात जे लाभले आहे त्यात समाधान मानायला हवे याची जाण होते. उबुंटु चित्रपटातील हे गाणे एकदा नक्की ऐका. 5 / 8आकाशी झेप घे रे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा|| जगदीश खेबूडकरांची गाणी ऐकणे हे खरंच मनासाठी औषध आहे. त्यांचे हे गाणे लोभ, मोह सोडायला भाग पाडते. मनात वाईट विचार येत असतील तर अशा वेळी हे गाणे ऐका. 6 / 8मन उधाण वाऱ्याचे गुंज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते || अग बाई अरेच्चा चित्रपटातील मन उधाण वाऱ्याचे हे गाणे गेली अनेक वर्षे लोकांच्या प्लेलिस्टमध्ये आहे. फार शांत गाणे आहे. गाव सोडून कामानिमित्त बाहेर राहणाऱ्यांना फार आपलेसे वाटते. गावच्या मातीची आठवण करुन देते. 7 / 8गारवा.. वाऱ्यावर भिरभिर पारवा नवा नवा पावसाळ्यात हे गाणे ऐकले नाही असा नेमकाच कोणी मराठी माणूस असेल. बाहेर वारा आणि पाऊस हातात चहाचा कप आणि कानात या गाण्याचे बोल हे जगातभारी कॉम्बिनेशन आहे. 8 / 8या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे हे मौल्यवान शब्द ज्यांच्या लेखणीतून कागदावर उतरले ते दिग्गज म्हणजे मंगेश पाडगांवकर. ही कविता गाण्यात रुपांतरीत झाली आणि लोकांना जीवनावर प्रेम करायला भाग पाडणारी ठरली. आयुष्यावर प्रेम करता आले पाहिजे हा मुळ मुद्दा घेऊन लोकांना चांगला दृष्टिकोन देणारे हे गाणे नक्की ऐका.