Join us

International Menstrual hygiene Day : मासिक पाळी म्हणजे विटाळ नव्हे, महिलांनी टाळायला हव्या ५ चुका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2025 16:23 IST

1 / 9
मासिक पाळी आल्यानंतर महिलांमध्ये मानसिक आणि शारीरिक बदल होतात. प्रत्येक महिन्याच्या २८ दिवसांनंतर मासिक पाळी येण्याचे चक्र असते. मासिक पाळी आल्यानंतर अनेकदा आपल्याला अस्वस्थ वाटते. तसेच शरीराच्या होमिओस्टॅटिस कमी होतात. (International Menstrual Hygiene Day)
2 / 9
मासिक पाळी आल्यानंतर अनेकदा महिलांना ओटीपोटीत दुखणे, अतिरक्तस्त्राव होणे, चक्कर येणे यांसारख्या समस्यांना जावे लागते. परंतु, पाळी आल्यानंतर महिलांनी या ५ चुका करणे टाळा. (Period mistakes to avoid)
3 / 9
मासिक पाळी आल्यानंतर पॅड सात-आठ तासांनी बदला. तसेच आरामदायी अंर्तवस्त्रे घाला, प्रायव्हेट पार्ट वेळोवेळी स्वच्छ करा. (Menstrual hygiene tips)
4 / 9
मासिक पाळी आल्यानंतर नियमितपणे अंघोळ करा. या काळात स्वच्छता राखल्यास आपण अनेक संसर्गजन्य आजारापासून दूर राहू शकतो.
5 / 9
पाळी आल्यानंतर शरीराचे कार्य चांगल्याप्रकारे होण्यासाठी हायड्रेट राहणे महत्त्वाचे आहे. अनेकदा आपण या काळात कमी प्रमाणात पाणी पितो ज्यामुळे शरीर डिहायड्रेट होते. यामुळे पोटफुगी, पेटके आणि डोकेदुखीचा त्रास वाढतो.
6 / 9
मासिक पाळीदरम्यान वॅक्सिंग करु नका. यामुळे त्वचेला वेदना होतात. या काळात शरीरातील हार्मोन्समध्ये बदल होत असतात. ज्यामुळे आपली त्वचा अधिक संवेदनशील असते.
7 / 9
पाळी आल्यानंतर हात पाय दुखणे, पोटात दुखण्याच्या समस्येवर आपण वेदनाशामक औषधे घेतो. यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. औषधे जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते. तसेच अपचन किंवा जळजळीची समस्या होते.
8 / 9
अनियमित झोपेमुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडते. पुरेशी झोप घेतली नाही की थकवा, मूड स्विंग आणि पोटदुखी वाढते. यामुळे मासिक पाळी येण्याचे चक्र बिघडते. त्यासाठी व्यवस्थित झोप घेणे आणि स्ट्रेस फ्री राहणे महत्त्वाचे आहे.
9 / 9
जास्त साखर आणि कॅफिनचे सेवन केल्याने मासिक पाळीत पोटफुगी, चिडचिड आणि हार्मोन्समध्ये चढ-उतार होतात. गोड खाण्याची क्रेव्हिंग झाल्यास हर्बल टी, डार्क चॉकलेट आणि फळे खा.
टॅग्स : आरोग्यमासिक पाळीचा दिवसमासिक पाळी आणि आरोग्य