1 / 6हिवाळा सुरू झाला की अनेक ठिकाणी तुळशीची पानं गळायला लागतात आणि तिच्या अगदी काड्या काड्याच दिसू लागतात. असं होऊ नये म्हणून पुढे सांगितलेल्या काही गोष्टी करून पाहा..2 / 6तुळशीला आलेल्या मंजिरी लगेचच काढून टाकाव्या. मंजिरी काढल्या नाहीत तर तुळशीची वाढ खुंटत जाते.3 / 6तुळशीच्या रोपाला खूप पाणी घालू नये. कुंडीतली माती कोरडी झाली आहे, असे दिसल्यासच पाणी घालावे. पाणी जास्त झाल्यास मुळं सडून तुळस खराब होऊ लागते.4 / 6हिवाळ्यात कुंडीतल्या मातीवर वर्तमान पत्राचा पेपर, वाळलेली पानं असं काही टाकून ठेवा. यामुळे माती जास्त थंड पडणार नाही.5 / 6रात्रीच्यावेळी तुळशीवर एखादा प्लास्टिकचा जाड कपडा किंवा सुती कपडा टाकून ठेवा. यामुळे तिला थेाडं उबदार वाटेल.6 / 6तुळशीचं रोप अशा ठिकाणी ठेवा जिथे तिला ४ ते ५ तास कडक ऊन मिळेल. या गोष्टींची काळजी घेतल्यास तुळस सुकणार नाही.