'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

Updated:June 19, 2025 17:59 IST2025-06-19T17:41:18+5:302025-06-19T17:59:44+5:30

आपल्या दैनंदिन जीवनात साखरेचे प्रमाण मर्यादित असणं खूप महत्त्वाचं आहे.

'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

आजच्या धावपळीच्या जीवनात आपण आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेत नाही, अन्नाकडेही जास्त लक्ष देत नाही. यामुळे अनेक वेळा अन्नातून घेतलेल्या साखरेचं प्रमाण वाढतं, जे आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.

'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

राष्ट्रीय आरोग्य अभियान (उत्तर प्रदेश) ने एका जागरूकता पोस्टद्वारे लोकांना मर्यादित प्रमाणात साखरेचे सेवन करण्याचा सल्ला दिला आहे. आपल्या दैनंदिन जीवनात साखरेचे प्रमाण मर्यादित असणं खूप महत्त्वाचं आहे. ज्याद्वारे तुम्ही मधुमेह, लठ्ठपणा आणि हृदयरोग यासारख्या गंभीर आजारांपासून स्वत:चं रक्षण करू शकता.

'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

जर तुम्हाला कोल्ड ड्रिंक पिण्याची सवय असेल, तर तुम्ही हे लक्षात ठेवा की, ३०० मिलीलीटर सॉफ्ट ड्रिंकमध्ये ३१.८ ग्रॅम साखर आणि १३२ कॅलरीज असतात, जे आपल्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकतात.

'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

चॉकलेट पेस्ट्री जगभर सर्वांनाच आवडते, पण ती खाण्यास जितकी चविष्ट आहे तितकीच ती आरोग्यासाठी देखील हानिकारक आहे कारण त्यात १२ ग्रॅम साखर आणि २९७ कॅलरीज असतात.

'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

फ्लेवर्ड ज्यूसमध्ये ४६.८ ग्रॅम साखर आणि १८९ कॅलरीज असतात आणि चॉकलेटमध्ये २५ ग्रॅम साखर आणि १०० किलो कॅलरीज असतात, तर गुलाबजाममध्ये ३२ ग्रॅम साखर आणि २५४ किलो कॅलरीज असतात.

'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

भारतात साखरेचा वापर पारंपारिक मिठाई, सण आणि इतर कार्यक्रमात केला जातो. साखरेच्या वापरात वाढ होणं ही चिंतेची बाब आहे. भारतात साखर आणि साखरयुक्त पेयांच्या वाढत्या वापरामुळे लठ्ठपणा आणि टाइप २ मधुमेहाचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे.

'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

गेल्या काही दशकांमध्ये भारतात खाण्याच्या सवयींमध्ये मोठा बदल झाला आहे. जागतिकीकरणामुळे आज साखरेचे प्रमाण जास्त असलेलं अन्न आणि पेये पूर्वीच्या तुलनेत सहज उपलब्ध झाली आहेत. पारंपारिक मिठाईंसोबतच, थंड पेये आणि प्रक्रिया केलेले पदार्थांचे सेवन देखील वाढले आहे, जे आरोग्यासाठी धोकादायक बनले आहे.

'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

जर तुम्ही तुमच्या दैनंदिन जीवनात साखरेचे सेवन विचारपूर्वक केलं तर तुम्ही "मधुमेह", लठ्ठपणा आणि हृदयरोग यासारखे गंभीर आजार टाळू शकता. साखरेचं सेवन नियंत्रित करणं आणि संतुलित आहार घेणं अत्यंत आवश्यक आहे.

'या' आजारांची नावं ऐकाल तर साखर खाणंच आपोआप सोडून द्याल अन् निरोगी आयुष्य जगाल

तुमच्या दैनंदिन आहारात साखरेचं प्रमाण तपासा आणि लेबल्स वाचा. सॉफ्ट ड्रिंक्सऐवजी, लिंबूपाणी किंवा फळांचा रस प्या. सकस आहार घ्या. निरोगी जीवनशैली सुरू करा आणि तुमच्या मुलांनाही तेच शिकवा. दररोज व्यायाम करा.