पावसाळ्यात अजिबात खाऊ नका हे '५' पदार्थ, पचन बिघडेल-पोट दुखेल-होतील जुलाब
Updated:June 4, 2025 10:28 IST2025-06-04T08:59:16+5:302025-06-04T10:28:10+5:30
Do not eat these '5' foods at all during monsoon, they will cause indigestion, stomach ache and diarrhea : पोट पावसाळ्यात अजिबात बिघडणार नाही. फक्त हे काही पदार्थ खाणे टाळा.

पावसाळ्यात वातावरणातील आर्द्रता आणि तापमानातील बदलांमुळे अन्नपदार्थ खराब होण्याची शक्यता वाढते. असे पदार्थ खाल्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. असे काही पदार्थ आहेत जे नक्कीच त्रासदायक ठरु शकतात.
आरोग्यासाठी चांगले असणारे काही पदार्थ पावसाळ्यात आरोग्यासाठी वाईट ठरु शकतात. पावसामुळे मातीमुळे काही पदार्थ खराब होण्याची शक्यता जास्त असते. असे पदार्थ खाणे दोन महिने टाळा किंवा खाताना काळजी घ्या.
पावसाळ्यात दही, ताक यांसारख्या काही पदार्थ खाणे टाळावे. पावसाळ्यात अशा अन्नपदार्थांमध्ये जीवाणू लवकर तयार होतात. ज्यामुळे पोटाशी संबंधित आजार होऊ शकतात. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दही ताक भरपूर खावे मात्र पावसाळ्यात जरा कमी खा.
बाजारात काही फळे कापून चिरुन मिळतात. ती इतर ऋतूंमध्येही खाणे आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकतात. मात्र पावसाळ्यात त्यावर किटाणू जास्त असतात. टरबूज, खरबूज, कलिंगड, अशी फळे चिरुन ठेवलेली कधीही घ्यायची नाहीत.
हिरव्या पालेभाज्या आरोग्यासाठी फारच चांगल्या असतात. मात्र मेथी, पालक या भाज्यांवर किडे, अळ्या ,जिवाणू चटकन बसतात. तसेच ते पाल्यात पटकन दिसतही नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात पाले भाजी खाताना जरा सावध राहा. जिवाणूंमुळे विषबाधा होऊ शकते.
पावसाळ्यामध्ये आपण तळणीचे पदार्थ भरपूर खातो. वातावरणात जरा बदला झाला की लगेच वडा भजी हवीच. मात्र ते पदार्थ घरी करुन खाणे योग्य ठरेल. विकतचे तळीचे उघड्यावरचे पदार्थ अजिबात खाऊ नका.
पाऊस काही सतत पडत नाही. पाऊस थांबला की दोन दिवस प्रचंड उकडते म्हणून लोक गार पेय भरपूर पितात. मात्र पावसाळ्यात ताप, खोकला लगेच होतो त्यामुळे गार बर्फ असलेले पदार्थ टाळावेत.