Join us
Daily Top 2 Weekly Top 5

उन्हाळ्यात शरीराला घामाचा उग्र वास येऊन चारचौघांत लाज वाटते? दुर्गंधी कमी करण्यासाठी ५ टिप्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2026 18:40 IST

1 / 7
उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की खूप घाम यायला लागतो. सकाळी आंघोळीनंतर काही वेळ आपण फ्रेश असतो. पण नंतर जसा घाम वाढायला लागतो तशी तशी अंगाला खूप दुर्गंधी यायला लागते.
2 / 7
कधी कधी तर डिओ, परफ्यूम मारूनही उपयोग होत नाही. अशावेळी शरीराची दुर्गंधी घालविण्यासाठी काय उपाय करायला पाहिजे ते पाहुया..
3 / 7
आंघोळीच्या पाण्यामध्ये लिंबाचा रस किंवा ॲपल साईड व्हिनेगर घाला आणि त्याने आंघोळ करा. बराच वेळ फ्रेश वाटेल.
4 / 7
रोज वॉटर किंवा कोणतंही इसेंशियल ऑईल आंघोळीच्या पाण्यात घालून आंघोळ केल्यासही खूप चांगला परिणाम दिसून येईल.
5 / 7
आहारात काकडी, टरबूज, खरबूज असे पाणीदार पदार्थ जास्त प्रमाणात असू द्या. यामुळे शरीर हायड्रेटेड राहण्यास मदत होईल.
6 / 7
अंडरआर्म्समधले केस नियमितपणे स्वच्छ करा. त्यामुळेही काखेत घाम कमी येईल आणि शरीराची दुर्गंधी कमी होईल.
7 / 7
दिवसातून दोन वेळ थंड पाण्याने आंघोळ करा. यामुळे शरीर स्वच्छ होत राहील आणि घामाचा वास येणार नाही.
टॅग्स : ब्यूटी टिप्ससमर स्पेशलत्वचेची काळजीस्वच्छता टिप्स