Join us

'लोक काय म्हणतील' असा विचार करत झुरता? तब्बू सांगते तिनं केलेला खास उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2024 15:54 IST

काहीही करताना सतत लोकांचाच विचार तुमच्या डोक्यात येत असेल तर यावर कसा तोडगा काढायचा,त्याविषयी तब्बू काय सांगते आहे पाहा...

ठळक मुद्देतब्बूसारखा असा रोखठोक विचार कधी कधी का होईना पण नक्कीच करता आला पाहिजे..

आपल्यापैकी काही जण असे असतात जे अगदी बिंधास्त असतात. त्यांना जे वाटतं ते करतात, त्यांना जे बोलायचं ते बाेलतात, खातात, पितात, फिरतात, मजा करत स्वत:च्या मर्जीने आयुष्य जगतात.. त्याच्या अगदी उलट काही लोक असतात. या लोकांना सतत लोक काय म्हणतील, लोकांना काय वाटेल याची भीती असते. त्यांच्या आयुष्यातली प्रत्येक गोष्ट ते लोकांच्या धाकानेच करतात किंवा करण्याचं टाळतात. शिवाय काहीही केलं तरी आपल्याला आजुबाजुचे काय म्हणाले असतील, कोणी आापल्याला नावं तर ठेवली नसतील ना, त्यांनी आपल्याबद्दल काय विचार केले असतील, अशाच प्रश्नांचे कित्येक किडे त्यांच्या डोक्यात वळवळत असतात. अशा किड्यांना तुमच्या डोक्याबाहेर काढून फेकायचं असेल आणि मनमुक्त जगायचं असेल तर काय करायचं, हे तब्बू (Actress Tabu) सांगते आहे...

 

बॉलीवूड अभिनेत्री तब्बूच्या एका मुलाखतीचा छोटासा भाग सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. winwithmansi या इन्स्टाग्राम पेजवर तो व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये तब्बू म्हणते की लोक काय म्हणतील, लाेक माझ्याबद्दल काय विचार करतील याचा मी कधीच विचार करत नाही.

८ कारणांमुळे व्यायाम- डाएटींग करूनही वजन कमी होत नाही; पाहा तुमच्याही बाबतीत हेच होतंय का

कारण माझ्यासाठी काय महत्त्वाचं आहे आणि काय महत्त्वाचं नाही हे मला पक्कं ठाऊक आहे. माझ्या प्रायोरिटी काय आहेत, हे मला चांगलं माहित आहेे. त्यामुळे मला काय पाहिजे आहे आणि कशाकडे दुर्लक्ष करायचं आहे, हे मी खूप चांगलं ठरवू शकते. त्यामुळे लोकांच्या बोलण्याचा विचार अजिबातच माझ्या मनात येत नाही. 

 

तब्बू म्हणते की नेहमी हाच विचार करते की प्रत्येक जण आपापल्यापरीने विचार करायला मोकळे आहेत. मला जसे माझे विचार आहेत, माझी मतं आहेत, तशीच ती इतरांनाही आहेत. त्यामुळे ते त्यांचा त्यांचा विचार करणारच.

केस धुतल्यानंतर 'हा' पदार्थ लावा! जावेद हबीब सांगतात स्ट्रेटनिंग न करताही केस होतील सिल्की, मुलायम

पण तो मनाला किती लावून घ्यायचा आणि त्यांचं बोलणं कितपत गांभिर्याने घ्यायचं हे माझ्या हातात आहे. मी म्हणते तेच बरोबर आणि इतर म्हणतात ते चूक असं मुळीच नाही. पण मला माझे विचार आहेत, माझ्या प्रायोरिटी आहेत आणि त्यानुसार मी जगणार हे मला पक्कं माहित आहे. त्यामुळेच लोक काय म्हणतात, माझ्याविषयी काय बोलतात याच्याशी मला खरंच काहीही देणंघेणं नाही.. तब्बूसारखा असा रोखठोक विचार कधी कधी का होईना पण नक्कीच करता आला पाहिजे..

 

टॅग्स :मानसिक आरोग्यतब्बू