गावखेड्यातल्या बायकांची ही गोष्ट, त्यांनी शब्दश: चमत्कार करुन दाखवला आहे.(Odisha women revive dead river) अडाणी, अशिक्षित महिला पण त्यांनी आपल्या गावातल्या नदीलाच जीवनदान दिलं.(Rural women bring river back to life) आणि गावातलं जगणं बदलवून टाकण्यासाठी कष्ट उपसले.(Inspirational river revival story) ओडिशातील जगतसिंहपूरमधील कुजांग ब्लॉकमधील बलिया या गावातील ६५ महिलांची ही गोष्ट.(Women-led environmental success story) त्यांना सरकारी योजनेतून मिळालेल्या पैशातून त्यांनी काही पैसे एकत्र जमवले आणि गावातली नदी वाहती झाली. त्यांची गोष्ट वाचून अभिमान वाटेल..(Odisha rural development success)भारतात अनेक राज्यातील महिलांना सरकारकडून विविध स्तरातून योजनेचा लाभ घेता येते आहे. ओडिशातली एक योजना म्हणजे सुभद्रा योजना. २०२४ साली गावातील महिलांनीच बज्रबुद्धी प्राथमिक महिला सहकारी संस्था सुरु केली. नदीतील गाळ काढायचा आणि नदीकाठची खचलेली जमीन पुन्हा नीट करायची असं त्यांच्या मनात होतं. गावातील बलिया नदीच्या पात्रातील ३२ एकर जमीन पुनरुज्जीवित करणे हे त्यांचे सर्वात मोठे आणि महत्त्वाचे काम होते. महिलांच्या अथक परिश्रमानंतर २० दिवसांच्या आत त्यांनी ही जागा स्वच्छ केली.
त्यासाठी महिलांना मिळणारी ५००० रुपयांची सुभद्रा योजना ही त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरली. महानदीची उपनदी असलेली बलिया नदी, जी पुढे जटाधारी नदीला जाऊन मिळते. या नदीच्या मार्फत पिढ्यांपिढ्या मासेमारी, भाजीपाला लागवड आणि छोट्या शेतीद्वारे तिथल्या स्थानिक लोकसंख्येचे पालनपोषण करतेय. परंतु, मागच्या काही वर्षात नदीकाठी स्थानिकांनी अतिक्रमण केले आणि त्याचे पाणी अडवण्यात आले. महिलांनी स्थानिक प्रशासन आणि निवडून आलेल्या प्रतिनिधीला नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी वारंवार विनंती केली परंतु ती व्यर्थ ठरली. ज्या वेळी सरकारने सुभद्रा योजनेची घोषणा केली तेव्हा या महिलांनी स्वत:च्या बचतीतून काही रक्कम नदीला पुन्हा जीवनदान देण्यासाठी वापरण्याचा निर्णय घेतला. नदीच्या पाण्यापासून स्वत:साठी आणि गावातील इतर लोकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं सहकारी संस्थेच्या अध्यक्षा पुष्पलता जेना म्हणाल्या. त्यांनी या योजनेतून आणि साठवलेल्या पैशांतून ७ ते ८ लाख रुपये जमा केले. ज्या ठिकाणी माती सुकली होती त्या ठिकाणी मशीनचा वापर तर, बहुतेक काम हाताने केले. कुदळ आणि दृढनिश्चयाच्या बळावर महिलांनी नदीपात्रात साचलेला गाळ, चिखल आणि गवताचे तण काढून टाकले. यानंतर स्थानिकांसाठी त्यांनी नदीपात्रातील पाणी पुन्हा वापरण्यायोग्य केले. नदी पात्रातील घाण साफ केल्यानंतर तो भाग महिलांना मासेमारी वापरण्याची योजना आखली. त्यापैकी पंधरा जणांनी मासेमारीचे प्रशिक्षण घेतले. तसेच नदीच्या किनाऱ्यालगत भाजीपाला लागवड देखील सुरु केली.
आता थांबायचं नाय! मैत्रिणींचा सल्ला अन् जेईई सोडली, NDA कॅडेट हरसिमरन कौरच्या शौर्याची कहाणी
मत्स्यव्यवसाय संचालनालयातील सहकारी संस्थांच्या निरीक्षक दीपांजली साहू म्हणाल्या की, मुख्यमंत्री मच्छीजीवी कल्याण योजनेचा भाग असलेल्या मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांच्या पुनर्सक्रियण योजनेअंतर्गत ही संस्था २ लाख रुपये आणि प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत ३ लाख रुपये मिळविण्यास पात्र आहे. महिलांनी आधीच मासेमारीसाठी नदीचा ३२ एकर भाग भाडेतत्त्वावर घेतला आहे, या महिलांच्या जिद्दीला देखील सलाम आहे. स्व:खर्चातून नदी पात्र साफ करुन गावासाठी त्यांनी पुन्हा एकदा रोजगार निर्माण करुन दिला.