लहान मुलांना खेळायला जास्त आवडते. खेळण्यातली त्यांची आवडती वस्तू म्हणजे त्यांची बाहुली. (Young Girls Wearing Makeup)खेळण्या-बागडण्याच्या वयात मुली आपल्या बाहुल्यांनाही खूप नटवतात. कुठलाही सण समारंभ, लग्न, वाढदिवस असला तरी पालक देखील मोठ्या हौशीने त्यांचा मेकअप करतात.(Children and Cosmetics Safety) मुली देखील आपल्या आईचे व्यवस्थित निरीक्षण करुन आपल्या चेहऱ्याची रंगरोटी करतात. (Makeup Use in Young Girls)
लहान मुलींनी मेकअप करावा का? त्याच्या नाजूक, नितळ त्वचेला नुकसान पोहोचते का? सुंदर दिसण्याच्या नादात बालपण आणि तरुणपण गमवताय का? (Effects of Makeup on Young Skin) मुली या आपल्या आई-ताईच निरीक्षण करुन चेहऱ्यावर मेकअप करतात.(Health Risks of Cosmetics for Children) लग्न समारंभात तर या लहान मुली अगदी मोठ्या व्यक्तीसारखा मेकअप, लिपस्टिक, आयशॅडो, ब्लश वापरुन चेहऱ्याला सुंदर बनवतात पण असं करणं चुकीच आहे.
घरच्याघरी फक्त १० मिनिटांत करा पार्लरसारखं मॅनिक्युअर, सुंदर मऊ हात पाहून म्हणाल, क्या बात है!
डॉक्टर सांगतात की, लहान मुलींची त्वचा ही नाजूक असते. अगदी वयाच्या दहा-बारा वर्षापासून चेहऱ्यावर मेकअप केल्यास हानी होऊ शकते. त्वचा ही शरीराचा नाजूक अवयव आहे. मेकअपमध्ये अनेक केमिकल उत्पादनाचा वापर केला जातो. ज्याचा आपल्या त्वचेवर वाईट परिणाम होतो. ज्यामुळे पिंपल्स, रॅशेस आणि कमी वयात वृद्धत्व देखील येऊ शकते.
जर आपल्या शरीरातील अग्नीतत्व चांगले असेल तर आपल्या चेहऱ्याला नॅचरल लूक मिळतो. कारण मेकअपसाठी जे काही प्रोडक्ट्स वापरले जातात, त्यामध्ये काही प्रमाणात केमिकल्स वापरले जाते. त्यामुळे पाळीच्या विविध तक्रारी, केसगळती, पिंपल्स यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागते. चेहऱ्याला नॅचरली ग्लो कसा येईल याचा विचार करायचा. काजळ इतके सुंदर आहे की, ज्याने आपले दृष्टी छान होते. त्याचा वापर आपण करु शकतो. डाळिंबाच्या रसात खोबऱ्याचे तेल टाकून फ्रीजमध्ये ठेवून ते घट्ट केलं आणि ते जर आपण आयशॅडो किंवा गालाला लावल्याने नॅचरल लूक येऊ शकतो. ज्यामुळे त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी देखील होणार नाही. आपली त्वचा कायम ग्लोइंग राहिल.
त्यासाठी पालकांनी देखील अगदी लहान वयातच मुलींना मेकअप करण्याची सवय लावू नका. ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्याचे नैसर्गिक रंग हरवू शकतात. त्याची त्वचा उजळण्याऐवजी ती कोरडी, निस्तेज किंवा काळी पडू शकते. तसेच भविष्यात त्वचेच्या अनेक तक्रारी निर्माण होतील.