'गावात रेंज येईना, रस्ताही नाही', फेसबुक कमेंटच्या प्रश्नावर खा. कोल्हेंची उत्तरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 14:51 IST2020-01-28T14:51:06+5:302020-01-28T14:51:19+5:30
खासदार कोल्हे दिल्लीतील बैठका, गाठीभेटी किंवा कामासंदर्भातील पाठपुरावा सातत्याने

'गावात रेंज येईना, रस्ताही नाही', फेसबुक कमेंटच्या प्रश्नावर खा. कोल्हेंची उत्तरे
मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे हे आपल्या कार्यपद्धतीमुळे नेहमीच चर्चेत असतात. छत्रपती शिवाजी महाराजांची आणि संभाजी महाराजांची भूमिका साकारल्यामुळे अमोल कोल्हे महाराष्ट्रात परिचित झाले. त्यामुळे, महाराष्ट्रभर त्यांचे कार्यकर्ते आहेत. आपल्या मतदारसंघातील लोकांसाठी ते आपलं कर्तव्य बजावताना दिलेला शब्दही पाळण्याचा अटोकाट प्रयत्न करताना दिसून येते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाराष्ट्रातील सर्व खासदारांची अर्थसंकल्प 2020 या संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचा वृत्तांत खासदार कोल्हे यांनी आपल्या फेसबुक पेजवरुन शेअर केला होता. त्यासोबतच, बैठकीचे फोटोही शेअर केले आहेत.
या बैठकीस उपस्थित राहून शिरुर लोकसभा मतदारसंघातील पुणे-नाशिक महामार्गाचे सहापदरीकरण, किल्ले शिवनेरीवर रोपवे व शिवसृष्टी, भक्ती शक्ती कॅरिडोअर, पुणे-नाशिक रेल्वे संदर्भात एमआयडीसीची भूमिका, चाकण येथे विमानतळाची निर्मिती, मतदारसंघातील धरणाच्या बॅकवॉटरमध्ये लेक, डिस्ट्रीक्टच्या धरतीवर सहकारी तत्वावर पर्यटनपूरक व्यवस्था असे मतदारसंघातील विविध मुद्दे मांडण्याची संधी मिळाली, असे कोल्हेंनी सांगितले. कोल्हेंच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करुन प्रश्न विचारले. त्यावर, कोल्हेंनी समाधानकारक उत्तरे दिली.