मुंबई - आरेतील वृक्षतोडीवर तात्काळ निर्णय घेतला असून झाडांची कत्तल चालणार नाही. मेट्रोच्या कारशेडचं काम सुरु राहिला. मात्र, आरेतील वृक्षतोडीला स्थगिती देण्यात आल्याचं नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितलं. मुंबईतील विधिमंडळ वार्ताहर संघात पत्रकारांशी उद्धव ठाकरेंनी संवाद साधला. त्यावेळी, आरेतील कारशेडच्या स्थगितीचा निर्णय घेतल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. त्यावर, आमदार आणि उद्धव ठाकरेंचे पुत्र आदित्य ठाकरेंनी या निर्णयाचं स्वागत केलं असून मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी असल्याचं आदित्य यांनी म्हटलं असलं तरी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतरही मेट्रो कारशेडच्या कामाला स्थगिती देणे, हे दुर्दैवी आहे. मुंबईतील पायाभूत सुविधा प्रकल्पांबाबत राज्य सरकार गंभीर नाही, हेच यातून दिसून येते. शेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच असल्याचे ट्विट करत नव्या सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.
मेट्रो कारशेडला स्थगिती हे दुर्दैवी; हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 18:48 IST
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली टीका
मेट्रो कारशेडला स्थगिती हे दुर्दैवी; हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच
ठळक मुद्देशेवटी हानी सर्वसामान्य मुंबईकरांचीच असल्याचे ट्विट करत नव्या सरकारच्या या निर्णयावर टीका केली आहे.१५ वर्षात आधीच विलंब झालेले प्रकल्प आणखी रेंगाळतील असे म्हणत ट्विटरद्वारे देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.