मुख्यमंत्र्यांनी मोदींकडे राज्यपालांची तक्रार केली का?, संजय राऊतांनी दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 09:42 PM2021-06-08T21:42:21+5:302021-06-08T21:42:35+5:30

नक्कीच.. राज्यपाल हे थेट केंद्राचे प्रतिनिधी आहेत. राज्यपाल हे महाराष्ट्रात काही चुकीचं करत असतील, असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर नक्कीच मुख्यमंत्री त्यांची तक्रार पंतप्रधानांकडेच करणार.

Did the Chief Minister lodge a complaint at Modi against the Governor ?, Sanjay Raut replied | मुख्यमंत्र्यांनी मोदींकडे राज्यपालांची तक्रार केली का?, संजय राऊतांनी दिलं उत्तर

मुख्यमंत्र्यांनी मोदींकडे राज्यपालांची तक्रार केली का?, संजय राऊतांनी दिलं उत्तर

googlenewsNext
ठळक मुद्देनक्कीच.. राज्यपाल हे थेट केंद्राचे प्रतिनिधी आहेत. राज्यपाल हे महाराष्ट्रात काही चुकीचं करत असतील, असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर नक्कीच मुख्यमंत्री त्यांची तक्रार पंतप्रधानांकडेच करणार.

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांच्यात आज राजधानी दिल्लीत भेट झाली. मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण देखील उपस्थित होते. या बैठकीनंतर सोशल मीडियासह माध्यमांतही चांगलीच चर्चा रंगली आहे. या भेटीदरम्यान, मुख्यमंत्र्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तक्रार पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केल्याचीही चर्चा आहे. यासंदर्भातील प्रश्नावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. 

"दिल्लीत झालेली मुख्यमंत्री-पंतप्रधान भेट नक्कीच महत्वाची होती. मराठा आरक्षणाचा विषय तात्काळ सोडवावा, अशी मुख्य मागणी आहे. कारण आता तो विषय केंद्राच्या अखत्यारित आहे. त्यासोबतच पिक विमा योजना, बढतीतील आरक्षण आणि इतर महत्वाच्या विषयांवरही चर्चा झाली. चर्चा सकारात्मक झाली असल्याचं मला कळालं आहे. पंतप्रधानांनी सर्व विषय ऐकून आणि समजून घेतले आहेत", असंही संजय राऊत म्हणाले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची तक्रार मुख्यमंत्र्यांनी केली का, या प्रश्नावरही राऊत यांनी स्पष्टपणे उत्तर दिलं.  

नक्कीच.. राज्यपाल हे थेट केंद्राचे प्रतिनिधी आहेत. राज्यपाल हे महाराष्ट्रात काही चुकीचं करत असतील, असं मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर नक्कीच मुख्यमंत्री त्यांची तक्रार पंतप्रधानांकडेच करणार. त्यानुसार त्यांना ती संधी मिळाली आणि त्यांनी ती केली असणार, असे उत्तर राऊत यांनी दिले आहे. कॅबिनेटने घेतलेला निर्णय आणि शिफारसी राज्यपालांना पाठविल्या असतील तर त्यावर निर्णय घेणं हे राज्यपालांचं कर्तव्य आहे. यामागे राज्यपालांचा असा कोणता गहन अभ्यास चाललेला आहे? याबाबत मुख्यमंत्री नक्कीच पंतप्रधानांशी चर्चा करु शकतात, असेही राऊत यांनी मुंबई तकशी बोलताना म्हटले.

मोदी-ठाकरेंमध्ये 'वन टू वन' चर्चा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात वैयक्तिक चर्चा झाल्याचंही यावेळी सांगण्यात येत आहे. याबाबत विचारण्यात आलं असता संजय राऊत यांनीही त्यास दुजोरा दिला आहे. "होय, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांमध्ये अर्धातास वन टू वन चर्चा देखील झाली. दोन्ही चर्चा या अतिशय महत्वाच्या होत्या हे एवढंच मी सांगू शकतो", असं संजय राऊत म्हणाले. 

Web Title: Did the Chief Minister lodge a complaint at Modi against the Governor ?, Sanjay Raut replied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.