Coronavirus : मुख्यमंत्री मुंबईत, उपमुख्यमंत्री पुण्यात; बाकीच्या शहरांच काय? कोरोनावरून फडणवीसांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 04:37 PM2020-09-08T16:37:18+5:302020-09-08T16:43:51+5:30

मुख्यमंत्री केवळ मुंबईवर आणि उपमुख्यमंत्री पुण्यावर लक्ष देताहेत बाकी शहरांचं काय, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

Chief Minister in Mumbai, Deputy Chief Minister in Pune; What about the rest of the cities? Fadnavis's blow | Coronavirus : मुख्यमंत्री मुंबईत, उपमुख्यमंत्री पुण्यात; बाकीच्या शहरांच काय? कोरोनावरून फडणवीसांचा घणाघात

Coronavirus : मुख्यमंत्री मुंबईत, उपमुख्यमंत्री पुण्यात; बाकीच्या शहरांच काय? कोरोनावरून फडणवीसांचा घणाघात

Next
ठळक मुद्देराज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरोनाचा फैलावसरकारचे निर्णय कागदावरच राहिले असून, राज्य कोरोनाचा हॉटस्पॉट बनलंयअनेक महानगरपालिकांना सरकारकडून मदत मिळालेली नाही

मुंबई - राज्यातील कोरोवा रुग्णांच्या वाढत्या संख्येवरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सत्ताधारी ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये कोरोनाचा फैलाव झाला आहे. सरकारचे निर्णय कागदावरच राहिले असून, राज्य कोरोनाचा हॉटस्पॉट बनलंय. अशा परिस्थितीत मुख्यमंत्री केवळ मुंबईवर आणि उपमुख्यमंत्री पुण्यावर लक्ष देताहेत बाकी शहरांचं काय, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.

विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या फैलावाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार टीका केली. तसेच कोरोनाची परिस्थिती हाताळण्यासाठी राज्य सरकारकडून करण्यात आलेल्या नियोजनावरही फडणवीस यांनी टीका केली. कोरोनाबाबत राज्य सरकार गंभीर नाही आहे. मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील परिस्थितीवर लक्ष द्यायचं आणि उपमुख्यमंत्र्यांनी पुण्यातील परिस्थितीवर लक्ष द्यायचं. मग बाकीच्या शहरांचं काय. नागपूर, औंरंगाबाद, नाशिक या शहरांचं काय. या शहरांमध्ये आढावा बैठका कधी घेणार. अनेक महानगरपालिकांना सरकारकडून मदत मिळालेली नाही. नागपूर, औरंगाबाद आणि इतर शहरे ही काय महाराष्ट्राबाहेर आहेत का की मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्र हा मुंबई पुण्यापुरताच मर्यादित आहे का? असा सवाल फडणवीस यांनी केला. 



''राज्य इगोसाठी नाही, जनतेसाठी चालवायचं'', आरे कारशेडच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा टोला

आरे कारशेडच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे. विधानसभेत आरेमधील कारशेडचे काम बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर टीका करताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आरेची जागा उच्च न्यायालय, ग्रीन टेब्युनल, सुप्रीम कोर्ट मान्यता मिळाल्यानंतर निश्चित झाली होती.त्यानंतर तिथे काम सुरू झालं. डेपो, बाउंड्री वॉल, बिल्डिंग, अंडरपास तयार केला आणि पॅकेज सेव्हन त्याचा टनेल सगळं काम केलंय. आता ही कारशेड रद्द झाल्यानंतर या कामाचे पैसे कोण देणार. कसे वसूल होणार या कामाचे पैसे. ज्या ठिकाणी
मेट्रोचं काम बंद ठेवल्यामुळे दर दिवशी ४ साडेचार कोटी रुपयांचे नुकसान होत आहे.


''तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले होते; राज्यातील पोलीस भांडी घासायच्या लायकीचे आहेत,'' फडणवीसांचा थेट निशाणा

यावेळी गाजत असलेल्या मुंबई पोलिसांच्या अवमानाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरच निशाणा साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी राज्याचा गृहमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत मला पूर्ण कल्पना आहे. मात्र कधी कधी राजकीय हितसंबधांचा प्रभाव पोलिसांच्या कामगिरीवर होतो. आता पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याबाबत म्हणाल तर या सभागृहामध्येही अनेकदा पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना काही काळापूर्वी कल्याणच्या सभेत राज्यातील पोलीस हे भांडी घासायच्या लायकीचे आहेत, असे विधान केले होते. भूमिका बदलल्या की आपण कसे बदलतो याचं हे एक उदाहरण आहे. चर्चा करायची असेल, विषयांतर, विषय बदलायचे असतील तर ते कसं काय बदलता येतात हे आपण बघितलं आहे

Web Title: Chief Minister in Mumbai, Deputy Chief Minister in Pune; What about the rest of the cities? Fadnavis's blow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.